शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा केंद्र संचालकावर बोजा; प्राचार्यांचा ‘ताप’ वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:17 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला, तरी कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापकांचा ताप मात्र वाढला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी शिक्षण मंडाळाने कोऱ्या उत्तरपत्रिका कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना १५ मार्च रोजी दिल्या आहेत. याशिवाय या अनुषंगाने प्राप्त पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टिकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य देण्यात आले आहे. दरवर्षी या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात होतात. आता त्या उशिराने होणार असल्याने परीक्षा केंद्र असलेल्या प्राचार्यांना बोर्डाकडून मिळालेले साहित्य सांभाळून ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. याशिवाय या परीक्षेसाठी नियुक्त केंद्र संचालकांचीही जबाबदारी चांगलीच वाढली आहे.

परीक्षा अन्‌ पुढील प्रवेश कधी?

शिक्षण विभागाने दहावी-बारावीच्या परीक्षा मे अखेरीस व जूनच्या प्रारंभी होणार असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या परीक्षांची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे या परीक्षा कधी होतील, असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापकांना पडला आहे. शिवाय परीक्षा झाल्यानंतर अकरावी व अन्य अभ्यासक्रमांचे प्रवेश कधी होणार? असाही प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राचार्यांना पडला आहे.

जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : २८४८०

बारावीचे विद्यार्थी : २०५५२

बारावीच्या उत्तरपत्रिका व केंद्राचे साहित्य शाळेला प्राप्त झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा लांबल्यामुळे हे साहित्य किती दिवस सांभाळावे लागेल हे सांगता येत नाही. हे साहित्य सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्राचार्यांची आहे. त्यामुळे शाळेत एका सेवकाची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे.

-अनंत शिंदे, प्राचार्य कै. रामकृष्ण बापू विद्यालय, महातपुरी