शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रॉयल्टी भरण्याकडे वीटभट्टी चालकांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:13 IST

गंगाखेड : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असताना काही वीटभट्टी चालकांनी रॉयल्टी भरण्याकडे कानाडोळा केला असून, संबंधितांवर कारवाई ...

गंगाखेड : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असताना काही वीटभट्टी चालकांनी रॉयल्टी भरण्याकडे कानाडोळा केला असून, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी धजावत नसल्याने या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय शासनाला या माध्यमातून मिळणारा महसूलही बुडत आहे.

गंगाखेड शहरासह तालुक्यात ९६ वीटभट्ट्या सुरू आहेत. यामध्ये गंगाखेड महसूल मंडळात ४२, महातपुरी महसूल मंडळात १८, माखणी मंडळात ५, तर राणीसावरगाव महसूल मंडळात ३० वीटभट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्यांच्या माध्यमातून दरवर्षी ३० लाख ८८ हजार रुपयांची रॉयल्टी वसूल करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ही सर्व रॉयल्टी वसूल करणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. २०१९-२० या वर्षात गंगाखेड मंडळातील १०, महातपुरीतील ११. माखणीतील ३, राणीसावरगाव मंडळातील ८, अशा एकूण ३२ वीटभट्टी चालकांनी १२ लाख २६ हजार रुपयांची रॉयल्टी न भरता शासनाला चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही रॉयल्टी वसूल करण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची असताना त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.