शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

पहिल्याच पावसात रस्त्याचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST

परभणी : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका पहिल्याच पावसात बसला असून, बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने राष्ट्रीय ...

परभणी : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका पहिल्याच पावसात बसला असून, बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांची पार वाताहत झाली आहे. चिखलाने माखलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक ठप्प पडली असून, प्रशासनाला मात्र याचे सोयरसुतक नसल्याचेच दिसून येत आहे.

रस्ते आणि खड्डे यांचे जणू अतूट नाते असल्याचे जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यांवरून फिरल्यानंतर दिसून येते. त्यातच रस्त्याच्या निर्मितीची कामे अतिशय संथगतीने होत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. कल्याण-निर्मल या रस्त्यावर कोल्हा पाटी ते परभणी इथपर्यंतचे काम अर्धवट आहे. परभणी-जिंतूर मार्गावर पुलाची कामे रखडली आहेत. अशीच परिस्थिती गंगाखेड रस्त्याची आहे. तर वसमत रस्त्यावर राहाटी पुलाजवळ खोदकाम करून रस्त्याचे काम सुरू आहे.

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वच रस्त्यांचे पितळ उघडे पडले. गंगाखेड रस्त्यावर उड्डाणपुलापासून ते पिंगळगड नाल्यापर्यंत पाणी साचल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता. पिंगळगड नाल्याला पूर आल्याने या ठिकाणचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परभणी - पाथरी रस्त्यावर ताडबोरगावाजवळ पुलाचे काम सुरू असून, वळण रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही रात्री ठप्प झाली होती. जिंतूर रस्त्यावर तर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. पुलाच्या कामांसाठी केलेले वळण रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. वसमत रस्त्याचीही अशीच अवस्था आहे.

प्रमुख राष्ट्रीय महामार्गाबरोबरच ग्रामीण रस्त्यांची अवस्था तर न विचारलेलीच बरी. जिंतूर, पूर्णा या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांचे रस्ते चिखलमय झाले असून, दुचाकी आणि चारचाकी वाहने या रस्त्यांवरून नेताना कसरत करावी लागत आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती झाली नाही. कोरोनाच्या संकटामुळे रस्त्यांची कामे झाली नाहीत. परिणामी, वाहनधारकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

पूर्णेत सात गावांची वाहतूक ठप्प

पूर्णा तालुक्यातील चार मंडळात बुधवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. निळा ते महागाव, पूर्णा ते देगाव, पूर्णा ते पांगरा, पूर्णा - हयातनगर, आहेरवाडी - तेलगाव आणि पूर्णा - सावंगी या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकला होता. पावसामुळे हा मुरूम वाहून गेला असून, सर्व रस्ते चिखलाने माखले आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प आहे.

पिंगळगड पुलावर ट्रक आडवा

परभणी - गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी पर्यायी वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. बुधवारी पिंगळगड नाल्याला पूर आल्याने वळण रस्ता पाण्याखाली होता. त्यामुळे काही भागांत भराव वाहून गेला आहे. दरम्यान, या रस्त्याचा अंदाज न आल्याने सिमेंट घेऊन परभणी शहरात येणारा एक ट्रक रस्त्याच्या कडेलाच आडवा झाल्याची घटना १० जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.