शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

देश आरक्षणमुक्त करण्याचा भाजपचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

परभणी : एकेका समाज घटकाचे आरक्षण रद्द करून संपूर्ण भारत देश आरक्षणमुक्त करण्याचा डाव संघप्रणीत भाजप सरकारचा असून, त्यास ...

परभणी : एकेका समाज घटकाचे आरक्षण रद्द करून संपूर्ण भारत देश आरक्षणमुक्त करण्याचा डाव संघप्रणीत भाजप सरकारचा असून, त्यास आमचा विरोध आहे. काँग्रेस पक्ष याविरुद्ध तीव्र आंदोलन उभारणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भानुदास माळी यांनी येथे दिली.

जिल्हा काँग्रेसचा आढावा आणि संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. माळी हे ५ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेस माजी खा. तुकाराम रेंगे, भगवान कोळेकर, संतोष रसाळकर, प्रा. तुकाराम साठे आदींची उपस्थिती होती.

प्रा.भानुदास माळी म्हणाले, ओबीसीची परिस्थिती सध्या वाईट आहे. न्यायालयाने ओबीसीचा इम्पिरिकल डाटा मागविला आहे. हा डाटा केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे. तत्कालीन मनमोहनसिंग सरकारनेच तो तयार केला आहे. मात्र, भाजप सरकार हा डाटा जाणीवपूर्वक देत नाही. न्यायालयात तो देण्याची वेळ आलीच तर चुकीचाही दिला जाऊ शकतो, अशी आमची शंका आहे. त्यामुळे ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेस दिल्ली येथे तीव्र आंदोलन करेल. सरकारला जनगणना करण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र शासनाला समान नागरी कायदा करायचा आहे. त्यामुळेच चातुर्याने आमचे आरक्षण काढून घेण्याचे पाप संघप्रणीत भाजप सरकार करीत आहे, ते आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा माळी यांनी दिला. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण द्यावे, ओबीसीच्या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतुदी कराव्यात, ओबीसी महामंडळासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशा मागण्या राज्य शासनाकडे केल्या असल्याचे ते म्हणाले.