शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भिज पावसाने सुखावला बळीराजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST

परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी ...

परभणी : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस होत असून, गुरुवारी भिज पावसाने हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

यावर्षी जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने धडाक्‍यात हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही होत आहे. आतापर्यंत अनेक भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामांमध्ये गुंतले आहेत.

गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली आहे.

आतापर्यंत सर्वच भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काही भागात यापूर्वीच कापसाची लागवड झाली होती. आता सोयाबीन पेरणी केली जात आहे. गुरुवारी झालेला पाऊस शेतीसाठी पूरक ठरला आहे. या पावसाने जमिनीत खोलवर पाणी मुरण्यास मदत होणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. दरम्यान, यावर्षी जून महिन्यातच पेरण्यांना प्रारंभ झाला. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन या दोन प्रमुख पिकांच्या पेरणीवर भर दिला आहे.

जिल्ह्यात बुधवारी रात्रीदेखील जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. पूर्णा, परभणी आणि सोनपेठ या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यात २४.२, गंगाखेड १७.२, पाथरी ११, पूर्णा १७.९, पालम ११.७ आणि सोनपेठ तालुक्यात १८.८ मिमी पाऊस झाला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

चुकीच्या नोंदीमुळे संताप

बुधवारी रात्री जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. या पावसाची नोंद प्रशासनाने घेतली आहे; परंतु ही नोंद घेताना परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात चुकीच्या पद्धतीने नोंद घेण्यात आली. या मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असताना प्रशासनाने मात्र सिंगणापूर मंडळात १२८.३ मिमी पावसाची नोंद घेतली आहे. सिंगणापूर मंडळांमध्ये बुधवारी रात्री पावसाने हजेरी लावली; परंतु हा पाऊस अत्यल्प स्वरूपाचा होता. प्रशासनाने घेतलेल्या नोंदीनुसार सिंगणापूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे; परंतु या मंडळात अतिवृष्टीसारखा पाऊस झाला नाही. या गोंधळामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सोनपेठ तालुक्यातील ७ गावांचा संपर्क तुटला

सोनपेठ तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील नाल्यावर पाणी आल्याने गोदावरी नदी काठावरील सात गावांचा संपर्क गुरुवारी सकाळी काही वेळासाठी तुटला होता. बुधवारच्या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील नाल्याला पाणी आले. त्यामुळे या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. परिणामी काही काळासाठी हा मार्ग बंद राहिला. त्यामुळे उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, पिंपळगाव आदी ७ गावांचा संपर्क तुटला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या सातही गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता; परंतु अद्यापपर्यंत हा प्रश्‍न सुटलेला नाही.