शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

परभणी-मानवत रस्त्याची दुरावस्था; ३० कि.मी.च्या अंतरासाठी तब्बल एक तासाचा वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 17:01 IST

परभणी ते मानवत हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.

ठळक मुद्देअगणित खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मन:स्तापमागील दोन वर्षांपासून रस्त्याचे काम ठप्प

परभणी : जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर असलेले मानवत हे तालुक्याचे ठिकाण गाठण्यासाठी वाहनधारकांना चक्क एक तासांचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. रस्त्यावर एक-एक फुटावर असलेल्या खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाची जिल्ह्यात वाताहत झाली आहे. 

कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मानवत या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे बीड, नगर, पुणे जिल्ह्यात जाण्यासाठीही याच मार्गाचा वापर होतो.  पाथरी तालुक्याच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. मात्र त्यापुढे मानवत ते परभणीपर्यंतचा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला आहे. त्यापुढील काम ठप्प आहे. अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावर एक-एक फुटावर खड्डे पडल्याने खड्डे चुकवित वाहने चालविताना वाहनधारकांना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील एक महिन्यात या रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढली आहे. दोन ते तीन प्रवाशांना जीवही गमवावा लागला आहे. आधीच रस्त्यांवर खड्डे त्यात पुन्हा खोदकाम करुन ठेवले असल्याने वाहनधारकांची गोची होत आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक आहे. शिवाय मानवत, पाथरी या तालुक्यातील नागरिकांना जिल्हा गाठण्यासाठी हाच रस्ता आहे. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

जिल्ह्यातील महत्त्वाचा वर्दळीचा रस्तापरभणी ते मानवत हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. विशेष म्हणजे या मार्गावर बीड, नगर, पुणे, नांदेड, हिंगोलीकडे जाणारी वाहने सर्वाधिक आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून रस्त्याचे काम ठप्प झाल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. 

३० कि.मी.चे अंतरपरभणी ते मानवत हे केवळ ३० कि.मी. चे अंतर आहे. सर्वसाधारण गतीनेही वाहने चालविली तर अर्ध्या तासात मानवत शहर गाठणे शक्य होते. मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत आणि रस्ता अनेक भागात खोदून ठेवला आहे. त्यामुळे खड्डे चुकवित वाहने चालविताना वाहनधारकांना दुप्पट वेळ खर्च करावा लागत आहे. या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. महामार्ग प्राधिकरणही या बाबीकडे गांभिर्याने पाहत नसल्याने खड्डेमय रस्त्याची समस्या कायम आहे.

परभणी ते मानवत हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. एका बाजूने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून, वाहतुकीसाठी ठेवलेल्या रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने सावकाश चालवावी लागत आहे.  हा त्रास दररोजचा असल्याने त्रस्त झालो आहे.-बाळू मोते, वाहन चालक

मानवत-परभणी रस्त्यावर १९ कि.मी. अंतराचे रस्त्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे काम ठप्प झाले होते. आता या कामाला गती दिली असून, मार्च २०२१ पूर्वी या रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करुन घेतले जाणार आहे.-स्वप्नील रुद्रवार, सहायक अभियंता, महामार्ग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाparabhaniपरभणीhighwayमहामार्ग