शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

पीक कर्जासाठी बँकांकडून आखडता हात; परभणी जिल्ह्यात केवळ ३६ टक्के कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:49 IST

कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही.

ठळक मुद्देमागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटापासून त्रस्त झाला आहे. पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बँकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र रबी हंगाम संपला तरीही आतापर्यंत बँकांनी केवळ ३५.७८ टक्केच पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटापासून त्रस्त झाला आहे. कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ या संकटांमुळे शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी व खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी बँकांकडे पीक कर्जाची मागणी करतो. यावर्षी खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रबी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने ४५१ कोटी ८७ लाख रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले होते. मात्र बँकांनी खरीप हंगाम संपला, तरी आतापर्यंत केवळ २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करीत केवळ ३५.७८ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे यामध्ये बँक व्यावसायिक बँकांनी ४ हजार २२८ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप करीत १२.६७ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. खासगी बँकांनी १ हजार ११ शेतकऱ्यांना ९ कोटी ६० लाखांचे वाटप केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५ हजार १३९ शेतकऱ्यांना २५ कोटी ३७ लाख, तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक १९ हजार ६११ शेतकऱ्यांना ९३ कोटी ९८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ८४.५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. मात्र इतर बँकांनी यावर्षीच्या रबी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन पीक कर्जाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत आहे.

खरीप हंगामातही ६६ टक्केच वाटप२०२०-२१ या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने १६५५ कोटी २० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे बँकांना उद्दिष्ट दिले होते. मात्र बँकांनी शेतकरी अडचणीत असतानाही पीक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले. १ लाख ५७ हजार ५० शेतकऱ्यांना १ हजार ९२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करत ६६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे यावर्षीच्या खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बँकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठता आले नाही.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जparabhaniपरभणीFarmerशेतकरीagricultureशेती