शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त शेतकरी आता होणार लखपती; ७५ हजारांवरून थेट ३ लाख रुपये मिळणार

By हरी मोकाशे | Updated: February 9, 2024 18:42 IST

राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.

- मारोती जुमडे

परभणी : शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते. परंतु, या पुरस्कारानिमित्त देण्यात येणारी रक्कम ही तूटपुंजी होती. मात्र, आता ७ फेब्रुवारी रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाने यामध्ये थेट तीन पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता पुरस्कार मिळणारा शेतकरी थेट लखपती होणार आहे.

शेती क्षेत्रामध्ये दरवर्षी होणाऱ्या अमुलाग्र बदलामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कारांचा समावेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, या पुरस्कारांची मिळणारी रक्कम ही पुरस्कार स्वीकारण्यास जाणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती.

त्यामुळे कुठेतरी या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ व्हावी, यासाठी मागील काही वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु, आता ही मागणी राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे आता शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये तीन ते चार पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कार मिळालेला शेतकरी आता थेट कृषी विभागाच्या मदतीने लखपती होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने ७ फेब्रुवारी रोजी काढला आहे.

७५ हजारांवरून थेट ३ लाख मिळणारकृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये अकरा बाबींचा समावेश करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा राज्यातून एकाला देण्यात येतो. यामध्ये आतापर्यंत पुरस्कार विजेत्याला ७५ हजार रुपयांची रक्कम देण्यात येत होती. परंतु, नव्या शासन निर्णयानुसार संबंधित प्रगतशील शेतकऱ्याला तीन लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पुरस्कारप्राप्त शेतकरी थेट लखपती होणार आहे.

दरवर्षी १०३ शेतकऱ्यांना दिला जातो पुरस्कारशेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकांबाबत जगात वेगवेगळे होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्यवेळी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे गरजेचे आहे. या सर्व बाबी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ११ घटकांतर्गत वर्षभरात जवळपास १०३ शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यामध्ये सर्वाधिक वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार म्हणून ३४ जणांना दिला जातो, तर त्यानंतर युवा शेतकरी पुरस्कारासह इतर शेतकऱ्यांनाही या पुरस्काराचे वितरण केले जाते. यामध्ये आता शेतकऱ्यांना तीन लाखापासून ते एक लाख रुपयांपर्यंत पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीparabhaniपरभणी