शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुळी बंधारा कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले ...

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले आहेत. त्यानंतर या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण होत असलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व नदीकाठच्या गावांमधील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११मध्ये मुळी येथे नदीपात्रात निम्न पातळीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे २०१२ व २०१६ असे दोनवेळा क्षतीग्रस्त झाल्याने या बंधाऱ्यात येणारे पाणी तसेच पुढे वाहून जात आहे. मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेला मुळी बंधारा शोभेचे बाहुला ठरत आहे. या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करत तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. यामुळे मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाऱ्याला उचल पध्द्तीचे दरवाजे बसविण्याच्या कामासाठी शासनाने १५ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या दरवाज्यांच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक नांदेड येथील पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्याला मंजुरी मिळताच या कामाची निविदा काढून दरवाजे बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण सुरु झाल्यास गंगाखेड शहरासह सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासह सुमारे १,७०५ हेक्टरपेक्षा अधिक शेत जमिनीवरील सिंचनाचा प्रश्नही सुटणार आहे.

जनता दरबारात उपस्थित केला प्रश्न

गंगाखेड तालुक्यातील शेतीचे अर्थचक्र, पिण्यासाठी पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मुळी बंधाऱ्याच्या दरवाजांच्या कामासाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारावेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर ओंकार पवार, दादासाहेब पवार, दीपक वैरागर, सखाराम पवार, गोविंद जाधव, नामदेव पसार, सुधीर खळीकर, दीपक पवार, चांगदेव सोन्नर, मंचक पवार, संतोष गौरशेटे, विजय बेद्रे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.