शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई आराखडे देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:53 IST

जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या निरीक्षणामध्ये ४७० गावे संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या गावांची तालुकानिहाय यादी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाई सारखी परिस्थिती निर्माण झाली तर तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १७ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये करावयाच्या कामांमध्ये कृती आराखडा सादर करण्याचे सूचित केले आहे.मात्र जिल्हा परिषदेतून हे टंचाई कृती आराखडे जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाले नाहीत. वारंवार सूचना देऊनही आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत असून जिल्हाधिकारी कार्यालयाला संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई निवारण्याचा कृती आराखडा शासनाला सादर करावयाचा आहे. मात्र जिल्हा परिषदेकडूनच हे कृती आराखडे मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय हतबल झाले असून हे आराखडे सादर करण्यास प्रशासनाला विलंब होत आहे.परिणामी टंचाई काळातील उपाययोजनांसाठी निधीची मागणी करताना प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत.सहा महिन्यांचा कृती आराखडाजिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हे कृती आराखडे सादर केले जातात. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा प्रत्येकी तीन महिन्यांचा स्वतंत्र कृती आराखडा द्यावयाचा आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची यादी, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजना असा हा कृती आराखडा आहे. या आराखड्यासोबत ग्रामसभेचा ठराव, पप्रत्र अ व पप्रत्र ब या स्वरुपात जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा आहे. परंतु, हे कृती आराखडे सादर करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.