शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई आराखडे देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:53 IST

जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात केलेल्या निरीक्षणामध्ये ४७० गावे संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. या गावांची तालुकानिहाय यादी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाई सारखी परिस्थिती निर्माण झाली तर तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १७ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये करावयाच्या कामांमध्ये कृती आराखडा सादर करण्याचे सूचित केले आहे.मात्र जिल्हा परिषदेतून हे टंचाई कृती आराखडे जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाले नाहीत. वारंवार सूचना देऊनही आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत असून जिल्हाधिकारी कार्यालयाला संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई निवारण्याचा कृती आराखडा शासनाला सादर करावयाचा आहे. मात्र जिल्हा परिषदेकडूनच हे कृती आराखडे मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय हतबल झाले असून हे आराखडे सादर करण्यास प्रशासनाला विलंब होत आहे.परिणामी टंचाई काळातील उपाययोजनांसाठी निधीची मागणी करताना प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत.सहा महिन्यांचा कृती आराखडाजिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत हे कृती आराखडे सादर केले जातात. जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा प्रत्येकी तीन महिन्यांचा स्वतंत्र कृती आराखडा द्यावयाचा आहे. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची यादी, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजना असा हा कृती आराखडा आहे. या आराखड्यासोबत ग्रामसभेचा ठराव, पप्रत्र अ व पप्रत्र ब या स्वरुपात जिल्हा प्रशासनाला सादर करावयाचा आहे. परंतु, हे कृती आराखडे सादर करण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.