शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

परभणी : शेतकºयांच्या प्रश्नांवर हल्लाबोल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:24 IST

तुळजापूरहून निघणाºया हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्नांसह शेतकºयांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असून, १६ ते २४ जानेवारी दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तुळजापूरहून निघणाºया हल्लाबोल यात्रेत स्थानिक प्रश्नांसह शेतकºयांच्या प्रश्नांवर आवाज उठविणार असून, १६ ते २४ जानेवारी दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली़हल्लाबोल यात्रेच्या पूर्व तयारी करण्याच्या अनुषंगाने रविवारी आ.धनंजय मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस पदाधिकाºयांची बैठक घेतली. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आ.मुंडे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकºयांची कर्जमाफी, हमीभाव, बोंडअळी आदी समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे़ परंतु, याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे़ त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १६ जानेवारीपासून मराठवाड्यातील तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रेला सुरुवात होणार आहे़ ही यात्रा मराठवाड्यातील आठ जिल्हे व २७ तालुक्यांतून निघणार आहे़या यात्रेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते सहभागी होणार आहेत़ स्थानिक प्रश्नांसह मराठवाड्यातील गंभीर प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे़, असे मुंडे यांनी सांगितले. ३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून यात्रेचा समारोप होणार आहे़, अशी माहिती त्यांनी दिली.या पत्र परिषदेस माजीमंत्री प्रकाश सोळंके, आ़विक्रम काळे, आ़बाबाजानी दुर्राणी, आ़रामराव वडकुते, आ़ डॉ.मधुसूदन केंद्रे, आ़विजय भांबळे, सोनाली देशमुख, प्रताप देशमुख, अ‍ॅड़बाळासाहेब जामकर, मारोती बनसोडे, सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती़२२ व २३ जानेवारी रोजी परभणीत आगमनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांसह मराठवाड्यातील गंभीर प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे़२२ जानेवारी रोजी परभणी येथे या यात्रेचे आगमन होणार असून, सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा होणार आहे. तसेच २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पाथरी व दुपारी ३ वाजता सेलू येथे यात्रेचे आगमन व जाहीर सभा होईल. या यात्रेची जिल्ह्यात जोरदार पूर्व तयारी केली जाणार आहे. या अनुषंगाने राष्टÑवादी काँग्रेसच्या तालुकानिहाय बैठकाही होणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.