शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पालमचा पोलीस वसाहतीचा परिसर पडला ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

पालम : शहरात पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी वर्गाला वास्तव्यासाठी असलेला परिसर चक्क ओसाड पडला आहे. इमारत जुनाट ...

पालम : शहरात पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी वर्गाला वास्तव्यासाठी असलेला परिसर चक्क ओसाड पडला आहे. इमारत जुनाट झाल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून दुरवस्था झाली आहे.

पालम शहरात ताडकळस रस्त्यावर ग्रामीण रूग्णालय इमारतीच्या पाठीमागे पोलीस कर्मचारी वसाहत असून, २० ते २५ जुनाट खोल्यांची इमारती आहेत. पूर्ण पत्रे तुटून गेल्याने खोल्या उघड्या झाल्या आहेत. तर भिंतीला तडे गेल्याने जागोजागी खचल्याने आहेत. कोणीही कर्मचारी वास्तव्यास नसल्याने दारे व खिडक्या मोडून पडल्या आहेत. मागील १५ वर्षापासून हा परिसर अस्वच्छ बनला आहे. ५ एकर जागा असून, ही इमारत दुरवस्था झाल्याने वास्तव्यास राहण्यासाठी लायक जागा राहिलेली नाही. त्यामुळे पोलिसांना किरायाच्या घरात रहावे लागत आहे. या ठिकाणी मुबलक प्रमाणात जमीन असल्याने नवीन इमारत बांधकाम होणे गरजेचे आहे.

थोमपट्टा

विश्रामगृहाला घाणीचा विळखा

पालम : शहरात जायकवाडी वसाहत परिसरात असलेल्या विश्रामगृहाची दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रीयमार्ग यंत्रणेचे कार्यालय आहे. परंतु, पूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त पाणी व घाणीचे वेढलेला आहे. त्यामुळे या भागात कर्मचारी व नागरिक यांना जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पालम : शहरात सार्वजनिक रस्ता व ठिकाणी परिसरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरभर कोठेही रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे लावली जात आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनांची कोंडी होऊन गैरसोय वाढली आहे.

राज्य मार्गावर मातीचे ढिगारे

पालम : पालम ते ताडकळस या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे कामे सुरू आहेत. या ठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहेत. पुलावरून वाहने जाताच धुळीचा लोट उडत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना त्रास वाढला आहे. काम करणारा गुत्तेदाराचे लक्ष राहिलेले नाही.

दस्त नोंदणीला गर्दी

पालम : शहरात जमीन व इतर मालमत्ता खरेदी विक्री दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. सध्या शासनाचा ग्रामीण भागात केवळ ३ टक्के शुल्क आकारला जात असल्याने नेहमीपेक्षा अर्धा रकमेत दस्त नोंदणी केली जात आहे. त्यामुळे गर्दी वाढली आहे.

सेल्फी पॉईंटचा धोका

पालम : पालम ते ताडकळस रस्त्यावर धानोरा काळे पुलावर डिग्रस बंधाऱ्याचे बॅकवाॅटर असल्याने गोदावरी नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. दोन्ही बाजूंना पाणी दिसत आहे. त्यामुळे अनेकजण वाहने उभी करून पाण्यात सोबत सेल्फी काढत आहे. सेल्फी घेताना जीव धोक्यात घालून सेल्फी काढली जात आहे.