शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

परभणी येथे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:40 IST

शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात १० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून मोरे बोलत होते़ व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर, कॉ़ अशोक उफाडे, डॉ़ अनिल कांबळे, राजेश उफाडे, उत्तम गोरे, अनिल नेटके, कॉ़ गणपत भिसे, विजय क्षीरसागर, वर्षाताई लांडगे, जोशीला लोमटे आदींची उपस्थिती होती़ यावेळी मोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी स्वत: गरिबी जगली़ त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकातून व्यक्त करीत गरीबांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले़ या माध्यमातून अण्णा भाऊंनी माणसे जपली़ त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे़ आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, चांगल्या शाळेत गेले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले़ साहित्य संमेलन विचारांचे संमेलन आहे़ यातून प्रत्येकाची वैचारिक भूमिका मांडली जाते, असे सांगत समाजाने आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, डॉ़अनिल कांबळे, विजय क्षीरसागर, राजेश उफाडे यांनीही मार्गदर्शन केले़ अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती़चळवळ जनतेची बनली पाहिजे- तोडकरमातंग समाजावर अजूनही अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार केले जातात़ स्मशानभूमीसाठी अजूनही लढा उभारावा लागतो़ त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत संघटनेला बळ दिले पाहिजे़ यातूनच आपले प्रश्न मार्गी लागतील, असे मत संमेलनाचे उद्घाटक विश्वनाथ तोडकर यांनी व्यक्त केले़ तोडकर म्हणाले, प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजानेच आता कार्यकर्त्यांना पाठबळ दिले पाहिजे़ कोण्या एकट्याचे प्रश्न नसून सर्व समाजाचे आहेत़ त्यामुळे एकत्रित येत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले़ तसेच सध्या यात्रा, जत्रा, गुलाल उधळणे या माध्यमातून समाजाला मागे नेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप तोडकर यांनी केला़ आजही आपला समाज अशिक्षीत असून, शिक्षण घेऊन अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण वाचले पाहिजे, असे आवाहनही तोडकर यांनी केले़स्टॉल्सवर गर्दीयावेळी सभागृहाच्या परिसरामध्ये पुस्तकांचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते़ पुस्तकांच्या स्टॉल्सवर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी होती़ तसेच मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी सभागृहही खचाखच भरले होते़ परिसंवाद, लोकसंवादासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.