शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी येथे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:40 IST

शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अनिल मोरे यांनी केले़परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात १० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदावरून मोरे बोलत होते़ व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशराव वरपूडकर, जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर, कॉ़ अशोक उफाडे, डॉ़ अनिल कांबळे, राजेश उफाडे, उत्तम गोरे, अनिल नेटके, कॉ़ गणपत भिसे, विजय क्षीरसागर, वर्षाताई लांडगे, जोशीला लोमटे आदींची उपस्थिती होती़ यावेळी मोरे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी स्वत: गरिबी जगली़ त्यामुळे त्यांनी आपले अनुभव पुस्तकातून व्यक्त करीत गरीबांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले़ या माध्यमातून अण्णा भाऊंनी माणसे जपली़ त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे़ आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, चांगल्या शाळेत गेले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले़ साहित्य संमेलन विचारांचे संमेलन आहे़ यातून प्रत्येकाची वैचारिक भूमिका मांडली जाते, असे सांगत समाजाने आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्रित लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले़ यावेळी माजी मंत्री सुरेश वरपूडकर, डॉ़अनिल कांबळे, विजय क्षीरसागर, राजेश उफाडे यांनीही मार्गदर्शन केले़ अशोक उफाडे यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती़चळवळ जनतेची बनली पाहिजे- तोडकरमातंग समाजावर अजूनही अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार केले जातात़ स्मशानभूमीसाठी अजूनही लढा उभारावा लागतो़ त्यामुळे संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत संघटनेला बळ दिले पाहिजे़ यातूनच आपले प्रश्न मार्गी लागतील, असे मत संमेलनाचे उद्घाटक विश्वनाथ तोडकर यांनी व्यक्त केले़ तोडकर म्हणाले, प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजानेच आता कार्यकर्त्यांना पाठबळ दिले पाहिजे़ कोण्या एकट्याचे प्रश्न नसून सर्व समाजाचे आहेत़ त्यामुळे एकत्रित येत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले़ तसेच सध्या यात्रा, जत्रा, गुलाल उधळणे या माध्यमातून समाजाला मागे नेण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप तोडकर यांनी केला़ आजही आपला समाज अशिक्षीत असून, शिक्षण घेऊन अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण वाचले पाहिजे, असे आवाहनही तोडकर यांनी केले़स्टॉल्सवर गर्दीयावेळी सभागृहाच्या परिसरामध्ये पुस्तकांचे विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते़ पुस्तकांच्या स्टॉल्सवर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी होती़ तसेच मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी सभागृहही खचाखच भरले होते़ परिसंवाद, लोकसंवादासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.