शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
4
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
5
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
6
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
7
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
8
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
9
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
10
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
11
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
12
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
13
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
14
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
15
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
16
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
17
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
18
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
19
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
20
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया

परभणी जिल्ह्यात चारठाणा येथे पशू प्रदर्शन : ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:27 IST

शेतकºयांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे़ यासाठी पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच पशू संवर्धन विभागाने ग्रामीण भागात सुविधा पोहोचवून गावातच पशूधनावर उपचार करावेत, असे आवाहन आ़ विजय भांबळे यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा : शेतकºयांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे़ यासाठी पशूधनाची काळजी घेणे गरजेचे आहे़ तसेच पशू संवर्धन विभागाने ग्रामीण भागात सुविधा पोहोचवून गावातच पशूधनावर उपचार करावेत, असे आवाहन आ़ विजय भांबळे यांनी केले़जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे संत जनार्धन महाराज यांच्या यात्रेनिमित्त ५ जानेवारी रोजी पशू प्रदर्शन भरविण्यात आले होते. याप्रसंगी आ़ विजय भांबळे बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनार्धन महाराज संस्थानचे अध्यक्ष रामप्रसाद शर्मा तर प्रमुख पाहुणे म्हणून जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सभापती इंदूमतीताई भवाळे, राकाँचे ओबीसी पदाधिकारी नानासाहेब राऊत, सरपंच बी़जी़ चव्हाण, पशू संवर्धन उपायुक्त एम़ आऱ रत्नपारखी, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डी़टी़ वाघमारे, रामराव उबाळे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, बालासाहेब घुगे, शरद मस्के, बाळासाहेब घुगे, शरद मस्के, पुरुषोत्तम घुगे, पीक़े़ आकोसे, मधुकर भवाळे, बी़ आऱ देशमुख आदींची उपस्थिती होती़आ़ भांबळे म्हणाले, पशूधनाची काळजी करीत शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालनही करावे, असे त्यांनी सांगितले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकारी बीक़े़ जगाडे, एस़बी़ खाडे, डॉ़ साबने, बुचाले, सय्यद इम्रान, डॉ़ लाटकर, डॉ़ शाहीद देशमुख, बाबासाहेब म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले़ पी़ आऱ पाटील यांनी सूत्रसंचालन केले़पशू प्रदर्शनास प्रतिसादचारठाणा येथील पशू प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय गटातून २५, एचएफ जर्शी गाय २०, नर, मादी वासरे २५, एचएफ जर्शी वासरे २०, लाल कंधारी वासरे गटातून ४० पशू दाखल झाले होते़ यामध्ये लालकंधारी गटातून भागवत लिपणे यांची गाय प्रथम आली़ तर महादेव वाडेकर, हरिश्चंद्र हेंद्रे यांच्या गायीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला़ एचएफ जर्शी गाय गटातून भारत तोडकर यांची गाय प्रथम, गोकूळ क्षीरसागर यांची गाय द्वितीय तर रघुनाथ ताठे यांची गाय तृतीय आली़ लाल कंधारी वासरे गटातून दिलीप आढे यांचे वासरू प्रथम, दत्ता क्षीरसागर यांचे वासरू द्वितीय तर बालासाहेब रासवे यांचे वासरू तृतीय आले़ लाल कंधारी वळू गटातून अच्युतराव चव्हाण यांचा वळू प्रथम, प्रदीप सरोदे यांचा वळू द्वितीय तर शेषराव सुपनर यांचा वाळू तृतीय आला़