शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दारुड्या मुलाचा शेतीवर होता डोळा; वाटणीस नकार दिल्याने वडिलांची झोपेतच केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 17:49 IST

पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे. 

ठळक मुद्देशेतीच्या वाटणीसाठी दारुड्या मुलाने केला बापाचा खून

पालम ( परभणी ) : तालुक्यातील पेंडू येथे शेतीच्या वाटणी करण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. १५ ) रात्री घडली. रामराव शेषराव धूळगुंडे (६० ) मृताचे नाव आहे. पालम पोलिसांनी आरोपी मुलास अटक करून गजाआड केले आहे. 

पेंडू शिवारात धूळगुंडे परिवाराची ९ एकर शेती आहे. रामराव धूळगुंडे यांना ३ मुले आहेत. या तिघांना ६ एकर शेती वाटणी करून गावानजीकची ३ एकर शेती त्यांनी स्वतः च्या उदरनिर्वाहासाठी ठेवली होती. या शेतातील हिस्सा मला विकायचा आहे तो वाटून द्या म्हणून उत्तम रामराव धूळगुंडे ( ३२ ) याने तगादा लावला होता.  तो व्यसनी असल्याने त्याची पत्नी मुलासह माहेरी राहते. शेती नावाने करून दिल्यास विक्री करेल या भीती पोटी आई वडिलांनी वाटणी करण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून उत्तम आईवडिलांना दारू पिऊन नेहमी मारहाण करत असे. 

बुधवारी पाऊस पडल्याने शेतात काम करुन थकलेले रामराव धूळगुंडे आखाड्यावर झोपले होते. कोणी नसल्याने संधीचा फायदा घेत उत्तमने  रामाराव यांना लाकडाने माराहाण करून खून केला. रामराव यांच्या पत्नी हरिबाई धूळगुंडे गुरुवारी सकाळी शेतात गेल्या असता त्यांना मृतदेह बाजेवर दिसला. बाजूच्या खोलीत आरोपी मुलाला पाहून त्यांनी घात झाल्याचा ठावो फोडत गाव गाठले. ग्रामस्थांना घेऊन त्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठले. पोलीसांनी आरोपी उत्तमला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने, जमादार नामदेव राठोड करीत आहेत. 

टॅग्स :MurderखूनparabhaniपरभणीFamilyपरिवार