शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरोधात आजी-माजी विद्यार्थ्यांनी काढला आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 15:34 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देविद्यापीठातील परीक्षा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे

परभणी,दि.१० : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

विद्यापीठातील परीक्षा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. भ्रष्टाचारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. दोषी अधिकारी निलंबित झालेच पाहिजेत अशा घोषणा देत मोर्चाला सुरुवात विद्यापीठातील कृषी महाविद्यालयापासून सुरुवात झाली. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चा प्रशासकीय इमारत परिसरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलुगुरूंची खुर्ची बाहेर आणून त्यास हार घालून आपला रोष व्यक्त केला. दोन तास हे आंदोलन करण्यात आले.

परीक्षा विभागातील उपकुलसचिव यांच्या वरदहस्ताने विद्यापीठात अंदाधुंद कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढविणे , उत्तरपत्रिका घरपोच पोहचविणे, जाणून बुजून निकाल उशिरा लावणे असे प्रकार येथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यामुळे परीक्षा विभागाच्या उपकुलसचिवांना निलंबित करावे, परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी खाजगी दलाल लावले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क करून तडजोड केली जाते , अशा  दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, उत्तरपत्रिका फेर तपासणीची फी १०० रुपायांऐवजी १० रुपय करावी,  परीक्षा विभागास सर्व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात , सर्व विषयाचे ऑनलाईन निकाल घोषित करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ओंप्रकाशसिंह सिसोदिया, अनिल आढे, सुनील बागल, राजेंद्र लोणे, विजय सावंत, शरद हिवाळे, गौतम भालेराव आदीं पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.