शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी रिलायन्स विमा कंपनीच्या २ जिल्हा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 18:58 IST

कंपनीचे मुख्य समन्वयक प्रकाश थॉमस यांनी दिलेल्या २७८ कोटींच्या वितरणाच्या आश्वासनावर सुटका

परभणी: यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पिक विमा देण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या जालना व परभणी येथील जिल्हा प्रतिनिधींना ३० नोव्हेंबरच्या रात्री शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परभणी तालुक्यातील आर्वी येथे डांबून ठेवले. कंपनीचे मुख्य समन्वयक प्रकाश थॉमस यांनी अग्रीम व नुकसानीच्या मोबदल्यापोटी २७८ कोटींची मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा या दोन्ही प्रतिनिधींना सोडून देण्यात आले.

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तीन लाखहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभाग व विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून मदतीसाठीचा अहवाल विमा कंपनीच्या मुख्य कार्याुलयाकडे पाठविला. मात्र विमा कंपनीने वेगवेगळी कारणे देत विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी विभागाने विमा कंपनीच्या दोन राज्य समन्वयकांविरुद्ध परभणीत गुन्हे दाखल केले. त्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीबाबत विमा कंपनीकडून कोणत्याच हालचाली होताना दिसून आल्या नाही. त्यामुळे शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप घेतलेल्या पीक कापणी प्रयोगावर सुनावणीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस रिलायन्स विमा कंपनीचे परभणीचे जिल्हा प्रतिनिधी शिंदे व जालना येथील जिल्हा प्रतिनिधी अवधूत शिंदे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर हे दोन्ही प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन आर्वी येथे नेले. तेथे त्यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांच्या घरात डांबून ठेवले. रात्री ८.३०च्या सुमारास डांबून ठेवलेल्या प्रतिनिधींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी फोनवर पिक विम्याबाबत आश्वासन दिले; परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप २०२० व रब्बी २०२० चे ५६ कोटी व यावर्षीच्या खरीप हंगाम- २०२१ तक्रारींचे ३२५ कोटी आणि अग्रीम रक्कम जोपर्यंत मंजूर करण्यात येत नाही, तोपर्यंत या प्रतिनिधींना सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश थॉमस यांनी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या सदस्यांच्या अटी मान्य करून २६८ कोटी रुपयांची मदत १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांना देण्याचे त्यांनी मान्य केले. थॉमस यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर दोन्ही प्रतिनिधींना मध्यरात्री १.३० च्या सुमारास परभणीत आणून सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विश्वभर गोरवे, राजू देशमुख, अनंत कदम, अशोक कदम यांच्यासह पेडगाव, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, आर्वी येथील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी