शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

कौतुकास्पद ! परसबागेतून राबविला जातोय सेंद्रीय शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:22 IST

पोषण आहाराचा स्तर वाढविण्यासाठी होणार फायदा

ठळक मुद्दे उजळंबा ग्रामस्थांचा पुढाकार 

परभणी : तालुक्यातील उजळंबा येथे विवेकानंद सेवाभावी संस्था व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत परसबागेच्या माध्यमातून पोषणाचा स्तर वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती सुरु करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील उजळंबा येथे परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये पूर्णत: नैसर्गिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रासायनिक खताला फाटा देत, शेण खत व गांडुळ खताचा वापर करीत हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे समन्वयक विक्रम मोरे, संदीप भोजने, प्रा.विलास साखरे यांनी उजळंबा  येथील माधवराव साखरे यांच्या शेतात हा प्रयोग केला. या माध्यमातून महिला, गरोदर महिला, किशोरवयीन मुली, लहान मुुले यांच्या जीवनामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे प्रकल्प समन्वयकांनी सांगितले.

बालकांसाठी लाभउजळंबा येथे परसबागेअंतर्गत सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या टोमॅटे, वांगे, कारले यासह फळ भाजीपाला ग्रामस्थांबरोबरच बालकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे परसबागेतून सेंद्रीय शेतीचा राबविला जाणारा उपक्रम भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. शासनाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून उमेद अंतर्गत या प्रकल्पाची देखरेख करण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणी