शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

परभणी जिल्ह्यात कालव्यांच्या दुरुस्तीला प्रशासनाने दिला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:08 IST

जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात या कालव्याच्या सहाय्याने शेतीचे सिंचन केले जाते़ कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे़ अनेक ठिकाणी फरशी उखडली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ तसेच झुडपेही वाढले आहेत़ या कालव्यात अनेक ठिकाणी उपवितरिका असून, या वितरिकांमध्ये मागील काही वर्षांपासून पाणी वाहिले नसल्याने त्या बुजून गेल्या आहेत़ परिणामी कालव्यातून सोडलेले पाणी वितरिकांमधून टेलपर्यंत पोहचत नाही आणि सिंचनात अडथळे निर्माण होतात़ यावर्षी जायकवाडी प्रकल्पात पाणी उपलब्ध असल्याने हे पाणी परभणी जिल्ह्यासाठी मिळणार हे नक्की होते़ त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी वितरिकांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते़ मात्र पाटबंधारे विभागाने या दुरुस्तीलाच फाटा दिला आहे़ रबी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले जात असून, दुरुस्ती केली नसल्याने हे पाणी शेतकºयांना मुबलक प्रमाणात उपलब्ध मिळण्याबद्दल शंका निर्माण झाली आहे़विशेष म्हणजे, जायकवाडी प्रकल्पातून यावर्षी आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे़ परंतु, कालवेच खराब असतील तर जायकवाडीचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहचेल कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे़