शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

९० वर्षाची परंपरा कायम! तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचा अश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:40 IST

पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे.

- विठ्ठल भिसे पाथरी ( परभणी ) : जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचे विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्यातील मानाचा अश्र्व प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सहभागी झाला आहे. 9 जून रोजी देहू येथील पालखीसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. 14 जून रोजी पुण्यात सकाळी दाखल झाला आहे. दिंडी सोहळ्यात होणाऱ्या उभ्या आणि आडव्या रिंगणात अश्व सहभागी होतो.

पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर असणारा देवाचा अश्व या घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होतो आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवतो. माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा अश्व असतो. देवाच्या अश्वावर माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात.

रणेर घराण्याने ही परंपरा तीन पिढ्यांपासून म्हणजे सुमारे 90 वर्षांपासून जपली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर देवाच्या अश्वाचा मान हा रणेर घराण्याचा आहे. तर स्वाराच्या अश्वाचा अकलुजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळला आहे. पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हे दोन्ही अश्व देहूमध्ये येतात. यामध्ये बाभुळगावहून येणारा अश्व  बाभळगाव येथून आधी थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तिथे त्याची विधिवत पाद्यपूजा होते आणि तिथून हे अश्व चालत देहूकडे प्रस्थान ठेवतो. तुकोबांच्या पालखीबरोबरचा स्वाराचा अश्व हा अकलूजहून मोहिते पाटलांच्या घराण्यातून येतो. ही प्रथा सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी हा अश्व देहू येतो आणि देवाचा आणि स्वाराचा असा हा पालखी सोहळ्यात दोन्ही अश्वांचा प्रवास सुरू होतो.

11 दिवसांचा पायी प्रवास....पंढरपूर ते देहू हा 11 दिवसांचा बारामतीमार्गे पायी प्रवास अश्व करतो, त्याच्याबरोबर 50 टाळकरी मंडळी असतात. देहूच्या वेशीवर अश्व आल्यावर त्याची पाद्यपूजा होते, त्याच्यावर तुकोबांच्या पादुका ठेवल्या जातात आणि नंतर अश्व वारीत सहभागी होतो. 9 जून रोजी देहू येथून  पालखी सोबत अश्व सहभागी झाला आहे 

वर्षभर मुलासारखा सांभाळ....देवाच्या अश्वाचा रणेर कुटुंब स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करतात. तुकोबांच्या पालखीत सहभागी होणारा हा अश्व इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. साधारण 8 ते 9 वर्षांनी हा अश्व बदलला जातो. रणेर कुटुंब हा अश्व स्व- खर्चाने खरेदी करतात.

प्रस्थानाआधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम....पालखी सोहळ्याच्या दोन दिवस आधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात बाभुळगावचा देवाचा अश्व येतो. येथे एक दिवस त्याचा मुक्काम असतो. त्यानंतर हा अश्व देहूकडे जातो. बाभुळगाव आणि अकलूजहून आलेल्या या दोन्ही अश्वांचे गोल रिंगण बेलवडी, इंदापूर आणि अकलूज, तसेच उभे रिंगण माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे होते. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यावर काल्याच्या कीर्तनानंतर दोन्ही अश्व माघारी फिरतात.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीparabhaniपरभणी