शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

९० वर्षाची परंपरा कायम! तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचा अश्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:40 IST

पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे.

- विठ्ठल भिसे पाथरी ( परभणी ) : जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचे विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्यातील मानाचा अश्र्व प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी सहभागी झाला आहे. 9 जून रोजी देहू येथील पालखीसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. 14 जून रोजी पुण्यात सकाळी दाखल झाला आहे. दिंडी सोहळ्यात होणाऱ्या उभ्या आणि आडव्या रिंगणात अश्व सहभागी होतो.

पाथरी तालुक्यातील बाभाळगाव येथील विनायकराव नारायणराव रणेर यांच्या घराण्याने वारकरी संप्रदायाची ही परंपरा तीन पिढ्यापासून सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर असणारा देवाचा अश्व या घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होतो आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवतो. माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा अश्व असतो. देवाच्या अश्वावर माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात.

रणेर घराण्याने ही परंपरा तीन पिढ्यांपासून म्हणजे सुमारे 90 वर्षांपासून जपली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर देवाच्या अश्वाचा मान हा रणेर घराण्याचा आहे. तर स्वाराच्या अश्वाचा अकलुजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळला आहे. पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हे दोन्ही अश्व देहूमध्ये येतात. यामध्ये बाभुळगावहून येणारा अश्व  बाभळगाव येथून आधी थेट पंढरपूरला नेण्यात येतो. तिथे त्याची विधिवत पाद्यपूजा होते आणि तिथून हे अश्व चालत देहूकडे प्रस्थान ठेवतो. तुकोबांच्या पालखीबरोबरचा स्वाराचा अश्व हा अकलूजहून मोहिते पाटलांच्या घराण्यातून येतो. ही प्रथा सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी हा अश्व देहू येतो आणि देवाचा आणि स्वाराचा असा हा पालखी सोहळ्यात दोन्ही अश्वांचा प्रवास सुरू होतो.

11 दिवसांचा पायी प्रवास....पंढरपूर ते देहू हा 11 दिवसांचा बारामतीमार्गे पायी प्रवास अश्व करतो, त्याच्याबरोबर 50 टाळकरी मंडळी असतात. देहूच्या वेशीवर अश्व आल्यावर त्याची पाद्यपूजा होते, त्याच्यावर तुकोबांच्या पादुका ठेवल्या जातात आणि नंतर अश्व वारीत सहभागी होतो. 9 जून रोजी देहू येथून  पालखी सोबत अश्व सहभागी झाला आहे 

वर्षभर मुलासारखा सांभाळ....देवाच्या अश्वाचा रणेर कुटुंब स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करतात. तुकोबांच्या पालखीत सहभागी होणारा हा अश्व इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. साधारण 8 ते 9 वर्षांनी हा अश्व बदलला जातो. रणेर कुटुंब हा अश्व स्व- खर्चाने खरेदी करतात.

प्रस्थानाआधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम....पालखी सोहळ्याच्या दोन दिवस आधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात बाभुळगावचा देवाचा अश्व येतो. येथे एक दिवस त्याचा मुक्काम असतो. त्यानंतर हा अश्व देहूकडे जातो. बाभुळगाव आणि अकलूजहून आलेल्या या दोन्ही अश्वांचे गोल रिंगण बेलवडी, इंदापूर आणि अकलूज, तसेच उभे रिंगण माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे होते. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यावर काल्याच्या कीर्तनानंतर दोन्ही अश्व माघारी फिरतात.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीparabhaniपरभणी