शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

परभणी जिल्ह्यातील सव्वा दोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागणार ८१ कोटी

By मारोती जुंबडे | Updated: December 27, 2023 16:17 IST

९५ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान ; जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्ताव

परभणी : गत महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे सर्वाधिक ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले.

गत महिन्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी, गारपीट व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप हंगाम हातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांवर होत्या. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता खचला. त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला तत्काळ बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाने संयुक्त स्वाक्षरी अहवाल तयार करण्यासाठी पंचनामे सुरू केले. यामध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाचे ३३ हजार २२६ हेक्टर क्षेत्र, तर तूर पिकाचे १२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रब्बी हंगामातील सर्वाधिक हरभरा पिकाचे ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ निसर्गाने ओढवली. त्यापाठोपाठ केवळ ६९ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद केले आहे. या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. त्यासाठी लागणारा अहवाल प्रशासनाने तयार केला असून, यामध्ये २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता ही मदत केव्हा मिळणार, याकडे जिल्हा प्रशासनासह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

५८० गावांतील पिकांचे झाले नुकसान२७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट तसेच अतिवृष्टीने जिल्ह्यातील ५८० गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक १६९, पूर्णा तालुक्यातील ९४, परभणी तालुक्यातील ६५, सोनपेठ तालुक्यातील ५४, मानवत तालुक्यातील ५३, गंगाखेड, पालम ४२, सेलू तालुक्यातील ३० गावांचा या अहवालात समावेश आहे. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५९ हजार ९९२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तर सर्वात कमी गंगाखेड तालुक्यातील १ हजार १२३ शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये दाखविले आहे.

परभणी तालुक्यासाठी लागणार १८ कोटी ११ लाखअवेळी पाऊस व गारपिटीने परभणी तालुक्यातील ६५ गावांतील ३३ हजार ३० शेतकऱ्यांचे हरभरा, कापूस, तूर व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी परभणी तालुक्याला १८ कोटी ११ लाख ४४ हजार रुपयांची मदत लागणार आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्याच पाठोपाठ जिंतूर तालुक्याला १६ कोटी ६४ लाख, पूर्णा तालुक्याला १६ कोटी ८३ लाख, सेलू ४ कोटी ९३ लाख, पाथरी ३ कोटी ५४ लाख, मानवत ९ कोटी ८७ लाख, सोनपेठ ६ कोटी ६४ लाख, गंगाखेड ६५ लाख, तर पालम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांची मदत आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी