शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील सव्वा दोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लागणार ८१ कोटी

By मारोती जुंबडे | Updated: December 27, 2023 16:17 IST

९५ हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसान ; जिल्हा प्रशासनाने पाठविला प्रस्ताव

परभणी : गत महिन्यात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. या शेतकऱ्यांना मदतीसाठी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे सर्वाधिक ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले.

गत महिन्यात २७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी, गारपीट व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप हंगाम हातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामातील पिकांवर होत्या. मात्र, या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता खचला. त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला तत्काळ बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाने संयुक्त स्वाक्षरी अहवाल तयार करण्यासाठी पंचनामे सुरू केले. यामध्ये खरीप हंगामातील कापूस पिकाचे ३३ हजार २२६ हेक्टर क्षेत्र, तर तूर पिकाचे १२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रब्बी हंगामातील सर्वाधिक हरभरा पिकाचे ४८ हजार ५२७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ निसर्गाने ओढवली. त्यापाठोपाठ केवळ ६९ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पिकाचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अंतिम संयुक्त स्वाक्षरी अहवालात नमूद केले आहे. या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रतिहेक्टरी ८ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. त्यासाठी लागणारा अहवाल प्रशासनाने तयार केला असून, यामध्ये २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांचे ९५ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीपोटी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये लागणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता ही मदत केव्हा मिळणार, याकडे जिल्हा प्रशासनासह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

५८० गावांतील पिकांचे झाले नुकसान२७ व २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट तसेच अतिवृष्टीने जिल्ह्यातील ५८० गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक १६९, पूर्णा तालुक्यातील ९४, परभणी तालुक्यातील ६५, सोनपेठ तालुक्यातील ५४, मानवत तालुक्यातील ५३, गंगाखेड, पालम ४२, सेलू तालुक्यातील ३० गावांचा या अहवालात समावेश आहे. विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५९ हजार ९९२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तर सर्वात कमी गंगाखेड तालुक्यातील १ हजार १२३ शेतकऱ्यांचे नुकसान यामध्ये दाखविले आहे.

परभणी तालुक्यासाठी लागणार १८ कोटी ११ लाखअवेळी पाऊस व गारपिटीने परभणी तालुक्यातील ६५ गावांतील ३३ हजार ३० शेतकऱ्यांचे हरभरा, कापूस, तूर व ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी परभणी तालुक्याला १८ कोटी ११ लाख ४४ हजार रुपयांची मदत लागणार आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. त्याच पाठोपाठ जिंतूर तालुक्याला १६ कोटी ६४ लाख, पूर्णा तालुक्याला १६ कोटी ८३ लाख, सेलू ४ कोटी ९३ लाख, पाथरी ३ कोटी ५४ लाख, मानवत ९ कोटी ८७ लाख, सोनपेठ ६ कोटी ६४ लाख, गंगाखेड ६५ लाख, तर पालम तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांची मदत आवश्यक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी