शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने ८ गावांचा तुटला संपर्क ; पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST

परभणी : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडविला असून, पालम, पाथरी, मानवत या तालुक्यांत ओढ्यांना पूर आल्याने ८ ...

परभणी : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडविला असून, पालम, पाथरी, मानवत या तालुक्यांत ओढ्यांना पूर आल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून, पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दोन आठवड्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. पालम, पाथरी या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, आरखेड, घोडा, फळा, उमरथडी या गावांचा पालम शहराशी असलेला संपर्क सोमवारपासून ठप्प आहे. मंगळवारीही या पुलावर पाणी होते. पाथरी तालुक्यात मात्र सोमवारच्या पावसाने हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील हादगाव मंडळात १३० मि.मी., तर कासापुरी मंडळात १०६ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाथरी, सेलू, मानवत, पालम आदी भागांत पूरस्थितीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले होते. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांतील पिके पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हादगावात घुसले पाणी

पाथरी तालुक्यात हादगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस

पाथरी - मंगळवारी पहाटे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. हादगाव आणि कासापुरी मंडळात अतिवृष्टी झाली असून, ओढ्यांना पूर आला आहे. तसेच हादगाव येथील इंदिरानगर वसाहतीतील २५ घरांत पुराचे पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी शिरले होते. हादगाव बु. मंडळात १३० मि.मी. पाऊस झाला. पाथरी - आष्टी रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने १०० एकर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वडी येथील सोमेश्वर नदीला पूर आल्याने पाटोदा, निवळी, गोपेगाव या तीन गावचा संपर्क तुटला आहे. मरडसगाव ते हादगाव जोडणाऱ्या रस्त्यावर श्रीरामपूर वस्तीजवळ एका ओढ्याला पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. पाथरी-आष्टी-खेरडा राज्य मार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती.

कोल्हा ते कोथळा रस्त्यावरील वाहतूक बंद

मानवत : सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कोल्हा ते कोथळा रस्त्यावर असलेल्या धरमुडी नदीला पूर आल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तालुक्यातील कोथळा, नरळद, टाकळी नीलवर्ण, सोमठाणा, राजुरा आदी नऊ गावातील ग्रामस्थ मानवतला येण्यासाठी कोल्हा ते कोथळा रस्त्याचा वापर करतात. धरमोडी नदीला पुन्हा पूर आल्याने या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने ३१ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.