शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अतिवृष्टीने ८ गावांचा तुटला संपर्क ; पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST

परभणी : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडविला असून, पालम, पाथरी, मानवत या तालुक्यांत ओढ्यांना पूर आल्याने ८ ...

परभणी : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने हाहाकार उडविला असून, पालम, पाथरी, मानवत या तालुक्यांत ओढ्यांना पूर आल्याने ८ गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली असून, पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दोन आठवड्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. पालम, पाथरी या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सोमेश्वर, आरखेड, घोडा, फळा, उमरथडी या गावांचा पालम शहराशी असलेला संपर्क सोमवारपासून ठप्प आहे. मंगळवारीही या पुलावर पाणी होते. पाथरी तालुक्यात मात्र सोमवारच्या पावसाने हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील हादगाव मंडळात १३० मि.मी., तर कासापुरी मंडळात १०६ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे पाथरी, सेलू, मानवत, पालम आदी भागांत पूरस्थितीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले होते. पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांतील पिके पाण्याखाली गेली असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हादगावात घुसले पाणी

पाथरी तालुक्यात हादगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस

पाथरी - मंगळवारी पहाटे तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. हादगाव आणि कासापुरी मंडळात अतिवृष्टी झाली असून, ओढ्यांना पूर आला आहे. तसेच हादगाव येथील इंदिरानगर वसाहतीतील २५ घरांत पुराचे पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ग्रामपंचायत कार्यालयातही पाणी शिरले होते. हादगाव बु. मंडळात १३० मि.मी. पाऊस झाला. पाथरी - आष्टी रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने १०० एकर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच वडी येथील सोमेश्वर नदीला पूर आल्याने पाटोदा, निवळी, गोपेगाव या तीन गावचा संपर्क तुटला आहे. मरडसगाव ते हादगाव जोडणाऱ्या रस्त्यावर श्रीरामपूर वस्तीजवळ एका ओढ्याला पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. पाथरी-आष्टी-खेरडा राज्य मार्गावरील वाहतूकही काही काळ बंद होती.

कोल्हा ते कोथळा रस्त्यावरील वाहतूक बंद

मानवत : सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कोल्हा ते कोथळा रस्त्यावर असलेल्या धरमुडी नदीला पूर आल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तालुक्यातील कोथळा, नरळद, टाकळी नीलवर्ण, सोमठाणा, राजुरा आदी नऊ गावातील ग्रामस्थ मानवतला येण्यासाठी कोल्हा ते कोथळा रस्त्याचा वापर करतात. धरमोडी नदीला पुन्हा पूर आल्याने या रस्त्यावरील पुलावरून पाणी जात असल्याने ३१ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.