शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात रबीची ७५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:46 IST

यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुलै आणि आॅगस्ट महिन्यामध्ये पावसाने जिल्ह्यामध्ये उघडीप दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके शेतकºयांची हातची गेली होती. मात्र जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने विहीर, नदी, नाले आणि बोअरला मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले.१८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २ लाख ९५ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये ९२ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, २६ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर गहू तसेच ८५ हजार ८१४ हेक्टरवर हरभरा, २ हजार ३५१ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या रबी हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे.जायकवाडी, निम्न दुधनाचा शेतकºयांना झाला फायदा४जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत २ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीपूर्ण झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने जायकवाडी धरणे १०० टक्के तर निम्न दुधना प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे या पाण्याचा रब्बी हंगामात वापर होऊ शकतो, या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे एकदा तसेच निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे आणि दुधना नदीच्या पात्रातून असे दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.