शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

परभणी जिल्ह्यात रबीची ७५ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:46 IST

यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या रबी हंगामात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. त्यापैकी १८ डिसेंबरपर्यंत २ लाख ९५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ७५ टक्के पेरणी करण्यात आली आहे. पाच वर्षामध्ये पहिल्यांदाच १६१ टक्के क्षेत्रावर हरभºयाचा पेरा झाला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीला जुलै आणि आॅगस्ट महिन्यामध्ये पावसाने जिल्ह्यामध्ये उघडीप दिली होती. त्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके शेतकºयांची हातची गेली होती. मात्र जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने विहीर, नदी, नाले आणि बोअरला मूबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने यावर्षीच्या रबी हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले.१८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २ लाख ९५ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली आहे. यामध्ये ९२ हजार ९७९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, २६ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर गहू तसेच ८५ हजार ८१४ हेक्टरवर हरभरा, २ हजार ३५१ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असल्याने यावर्षीच्या रबी हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा आहे.जायकवाडी, निम्न दुधनाचा शेतकºयांना झाला फायदा४जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत २ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पेरणीपूर्ण झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने जायकवाडी धरणे १०० टक्के तर निम्न दुधना प्रकल्प ८० टक्के भरला आहे. त्यामुळे या पाण्याचा रब्बी हंगामात वापर होऊ शकतो, या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली आहे. जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे एकदा तसेच निम्न दुधना प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे आणि दुधना नदीच्या पात्रातून असे दोनदा पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उत्पन्न वाढीसाठी शेतकºयांना मोठा फायदा होणार आहे.