शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६९ उपद्रवी माकडांना केले पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ...

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील आंभई येथील समाधान गिरी यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कुपटा परिसरात मागील काही वर्षांपासून २५० ते ३०० माकडांचा मुक्तसंचार आहे. माकडांच्या उपद्‌व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, माकडांचा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थांनी गावातील झाडे तोडून त्यांचा निवारा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या माकडांनी घरांच्या पत्रावर, छतावर निवारा करण्यास सुरुवात केली आणि माकडांचा धुडगूस अधिकच वाढला. पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने पत्रे खिळखिळे होऊ लागली, तसेच छतावर ठेवलेले सोलारचे साहित्य व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून केली जात होती. अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहेत. या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर महिला-मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.

माकडांच्या या उपद्‌व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर, समीर दुधगावकर यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने वन्यजीव प्राणिमित्रांचे एक पथक ७ जुलै रोजी गावात दाखल झाले. या पथकातील समाधान गिरी यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून ६९ माकडांना कोणतीही इजा न होऊ देता, पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अभयारण्यात नेऊन सोडणार

या सर्व माकडांना बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सातपुडा अभयारण्यात नेऊन सोडले जाणार आहे, असे समाधान गिरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मदतीला संदीप गिरी, कृष्णा गिरी आदी उपस्थित होते. सरपंच अंकुश सोळंके, समीर दुधगावकर, नीलेश सोळंके, प्रताप सोळंके, राहुल सोळंके, गोपीनाथ सोळंके, शिवाजीराव सोळंके, अनिल गडदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माकडांच्या त्रासाला कंटाळून वृक्ष तोडणे हा पर्याय नाही. यासाठी ग्रामपंचायीने ठराव घेऊन वनविभागाला द्यावा, वनविभागातून आम्हाला कळविल्यास आम्ही माकडांना घेऊन जंगलात सोडतो. यामुळे वृक्षतोड थांबेल व पर्यायवरणाचीही हानी होणार नाही. त्याचप्रमाणे, माकडांना त्यांच्या हक्काचे घरही मिळेल.

समाधान गिरी, वन्यजीव प्राणिमित्र.