शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

६९ उपद्रवी माकडांना केले पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ...

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील आंभई येथील समाधान गिरी यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कुपटा परिसरात मागील काही वर्षांपासून २५० ते ३०० माकडांचा मुक्तसंचार आहे. माकडांच्या उपद्‌व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, माकडांचा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थांनी गावातील झाडे तोडून त्यांचा निवारा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या माकडांनी घरांच्या पत्रावर, छतावर निवारा करण्यास सुरुवात केली आणि माकडांचा धुडगूस अधिकच वाढला. पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने पत्रे खिळखिळे होऊ लागली, तसेच छतावर ठेवलेले सोलारचे साहित्य व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून केली जात होती. अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहेत. या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर महिला-मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.

माकडांच्या या उपद्‌व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर, समीर दुधगावकर यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने वन्यजीव प्राणिमित्रांचे एक पथक ७ जुलै रोजी गावात दाखल झाले. या पथकातील समाधान गिरी यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून ६९ माकडांना कोणतीही इजा न होऊ देता, पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अभयारण्यात नेऊन सोडणार

या सर्व माकडांना बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सातपुडा अभयारण्यात नेऊन सोडले जाणार आहे, असे समाधान गिरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मदतीला संदीप गिरी, कृष्णा गिरी आदी उपस्थित होते. सरपंच अंकुश सोळंके, समीर दुधगावकर, नीलेश सोळंके, प्रताप सोळंके, राहुल सोळंके, गोपीनाथ सोळंके, शिवाजीराव सोळंके, अनिल गडदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माकडांच्या त्रासाला कंटाळून वृक्ष तोडणे हा पर्याय नाही. यासाठी ग्रामपंचायीने ठराव घेऊन वनविभागाला द्यावा, वनविभागातून आम्हाला कळविल्यास आम्ही माकडांना घेऊन जंगलात सोडतो. यामुळे वृक्षतोड थांबेल व पर्यायवरणाचीही हानी होणार नाही. त्याचप्रमाणे, माकडांना त्यांच्या हक्काचे घरही मिळेल.

समाधान गिरी, वन्यजीव प्राणिमित्र.