शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

६९ उपद्रवी माकडांना केले पिंजऱ्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ...

कुपटा : मागील काही दिवसांपासून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडलेल्या कुपटा व परिसरातील ६९ माकडांना ७ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील आंभई येथील समाधान गिरी यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

कुपटा परिसरात मागील काही वर्षांपासून २५० ते ३०० माकडांचा मुक्तसंचार आहे. माकडांच्या उपद्‌व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, माकडांचा त्रास कमी व्हावा, यासाठी येथील ग्रामस्थांनी गावातील झाडे तोडून त्यांचा निवारा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या माकडांनी घरांच्या पत्रावर, छतावर निवारा करण्यास सुरुवात केली आणि माकडांचा धुडगूस अधिकच वाढला. पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने पत्रे खिळखिळे होऊ लागली, तसेच छतावर ठेवलेले सोलारचे साहित्य व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून केली जात होती. अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहेत. या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर महिला-मुलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.

माकडांच्या या उपद्‌व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आला. मात्र, उपयोग झाला नाही. त्यानंतर, समीर दुधगावकर यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याने वन्यजीव प्राणिमित्रांचे एक पथक ७ जुलै रोजी गावात दाखल झाले. या पथकातील समाधान गिरी यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून ६९ माकडांना कोणतीही इजा न होऊ देता, पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अभयारण्यात नेऊन सोडणार

या सर्व माकडांना बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय सातपुडा अभयारण्यात नेऊन सोडले जाणार आहे, असे समाधान गिरी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मदतीला संदीप गिरी, कृष्णा गिरी आदी उपस्थित होते. सरपंच अंकुश सोळंके, समीर दुधगावकर, नीलेश सोळंके, प्रताप सोळंके, राहुल सोळंके, गोपीनाथ सोळंके, शिवाजीराव सोळंके, अनिल गडदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माकडांच्या त्रासाला कंटाळून वृक्ष तोडणे हा पर्याय नाही. यासाठी ग्रामपंचायीने ठराव घेऊन वनविभागाला द्यावा, वनविभागातून आम्हाला कळविल्यास आम्ही माकडांना घेऊन जंगलात सोडतो. यामुळे वृक्षतोड थांबेल व पर्यायवरणाचीही हानी होणार नाही. त्याचप्रमाणे, माकडांना त्यांच्या हक्काचे घरही मिळेल.

समाधान गिरी, वन्यजीव प्राणिमित्र.