शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामासाठी द्यावे लागणार ४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

परभणी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात निधीचा खडखडाट झाल्याने आता जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक तरतूदीतून १५ टक्के निधी रस्त्यांच्या ...

परभणी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात निधीचा खडखडाट झाल्याने आता जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक तरतूदीतून १५ टक्के निधी रस्त्यांच्या कामांसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार येथील जिल्हा वार्षिक योजनेला यावर्षीच्या तरतूदीतून ४५ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. शासनाच्या अखात्यरितील विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. भौतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक विकासासाठी नियोजन समितीतून दरवर्षी कामाचा आराखडा तयार केला जातो. त्यानुसार निधीची मागणी करुन वर्षभरात ही कामे मार्गी लावली जातात. राज्य शासनाच्या योजना वगळता जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांचाही त्यात अंतर्भाव असतो. यावर्षी एप्रिल महिन्यात नियोजन समितीचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र त्यानंतर कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने कामे ठप्प आहेत. त्यातच यापूर्वी नियोजन समितीचा २५ टक्के निधी कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्याच्या कामकाजावर खर्च करण्यात आला आहे. आता नियोजन विभागाने एक अध्यादेश काढला असून, त्यात जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी तरतूदीच्या १५ टक्के निधी रस्त्यांच्या कामासाठी देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ राबविली जाते. मात्र यावर्षी या योजनेसाठी ग्रामविकास विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे रस्त्याची कामे प्रलंबित राहू शकतात. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी १० टक्के आणि अतिवृष्टी, पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५ टक्के निधी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक तरतूदीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी कोरोनासाठी आणि आता रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी वापरण्याची वेळ राज्य शासनावर ओढावल्याने राज्यातील आर्थिक स्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे.

३०० कोटींचा आराखडा

जिल्हा नियोजन समितीने यावर्षी जिल्ह्यातील विकास कामांसाठी ३०० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. पाच महिन्यांपूर्वी मंजूर तरतूदीच्या २५ टक्के निधी नियोजन समितीला प्राप्त झाला होता. हा निधी देताना तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मागील महिन्यात विकास कामांना गती देण्यासाठी १०० टक्के निधी वितरित करण्यात आला. मात्र नियोजन विभागाने दिलेल्या निर्देशानुसार तरतूदीपैकी १० टक्के निधी म्हणजे ३० कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे अतिवृष्टी, पुरामुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठी ५ टक्के प्रमाणे १५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.