शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टसाठी परभणीतून ४०० वाहक- चालक मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:25 IST

परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे.

ठळक मुद्देज्या मार्गावर कमी भारमान होते, अशा मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.परभणी विभागात १ हजार ७६० वाहक आणि चालक आहेत.

परभणी : मुंबई येथे बेस्टच्या बस वाहतूक सेवेसाठी जिल्ह्यातील ४०० वाहक आणि चालकांना मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, हे कर्मचारी पंधरा दिवस तेथे सेवा बजावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कमी भारमान असणाऱ्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबई येथे लोकल बससेवा चालविणाऱ्या ‘बेस्ट’साठी महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाने बस गाड्यांबरोबरच कर्मचारीही पुरविले आहेत. कोरोनाच्या संकट काळात मुंबईतील बससेवा सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राज्यभरातून टप्प्या-टप्प्याने कर्मचाऱ्यांना मुंबई येथे सेवेसाठी पाठविले जात आहे. कोरोनाची परिस्थिती आणि वाहक- चालकांची कमतरता लक्षात घेता, महामंडळाच्या परभणी विभागातून २०० वाहक आणि २०० चालक असे ४०० कर्मचारी २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, २३ नोव्हेंबरपासून सेवेत रुजू झाले आहेत.

परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी विभागातील काही बससेवांवर परिणाम झाला आहे. परभणी विभागात २ हजार ४२७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार ७६० वाहक आणि चालक आहेत. चारशे कर्मचारी मुंबईला रवाना केल्याने ५ टक्के बससेवा बंद कराव्या लागल्या आहेत. ज्या मार्गावर कमी भारमान होते, अशा मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक असलेल्या सेवांवर कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेऊन त्या मार्गावर बससेवा सुरू ठेवली जात असल्याने एस.टी. महामंडळातून सांगण्यात आले.

टॅग्स :state transportएसटीparabhaniपरभणी