शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

पेन्शन परतीच्या नोटिसीला ३५०० करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

२०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा ...

२०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. लघू व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत करदाता शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ होत असल्याचे समोर आले. त्यानंतर केंद्र शासनाने करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेतून उचललेला लाभ परत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परभणी येथील जिल्हा कार्यालयाने जिल्ह्यातील ४ हजार ९०० शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील उचललेला लाभ परत करावा, अशी नोटीस पाठवली होती. त्याअनुषंगाने या शेतकऱ्यांकडून ४ कोटी ४८ लाख ७० हजार रुपये पैसे जमा होणे अपेक्षित होते. परंतु, आतापर्यंत केवळ १ हजार २१६ शेतकऱ्यांनीच १ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. अद्यापही ३ हजार ६८४ शेतकरी पेन्शन परतीच्या नोटिसीला ठेंगा दाखवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांबाबत कडक धोरण अवलंबिणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत सव्वा कोटी रुपये वसूल

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत करदात्या शेतकऱ्यांकडून तालुका व जिल्हा प्रशासनाकडून हे पैसे परत घेतले जात आहेत. आतापर्यंत ४ हजार ९०० शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यानुसार केवळ १२१६ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, त्यांच्याकडून १ कोटी १४ लाख १६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून दोन ते तीन वेळेस पैसे भरण्याबाबत नोटीस पाठवण्यात आल्या. मात्र करदात्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाच्या या नोटिसीला प्रतिसाद मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

११०० शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही

खरीप व रब्बी हंगामात मागील दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान किसान पेन्शन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. मात्र अद्यापही जिल्ह्यातील जवळपास ११०० शेतकऱ्यांना केवळ किरकोळ त्रुटीमुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे महसूल प्रशासनातील तलाठी व ग्रामसेवकांकडे संबंधित शेतकऱ्यांनी अनेकवेळा आधार कार्ड, सातबारा यासह इतर कागदपत्रे जमा केले आहेत. मात्र अद्यापही अकराशे शेतकरी या योजनेपासून वंचित आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.