शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नोटिसीला ३५०० करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

२०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा ...

२०१९ मध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात सहा हजार रुपये देण्याचे ठरवण्यात आले होते. लघू व मध्यम शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली होती. मात्र पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत करदाता शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ होत असल्याचे समोर आले. त्यानंतर केंद्र शासनाने करदात्या शेतकऱ्यांनी या योजनेतून उचललेला लाभ परत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परभणी येथील जिल्हा कार्यालयाने जिल्ह्यातील ४ हजार ९०० शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील उचललेला लाभ परत करावा, अशी नोटीस पाठवली होती. त्याअनुषंगाने या शेतकऱ्यांकडून ४ कोटी ४८ लाख ७० हजार रुपये पैसे जमा होणे अपेक्षित होते. परंतु, आतापर्यंत केवळ १ हजार २१६ शेतकऱ्यांनीच १ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. अद्यापही ३ हजार ६८४ शेतकरी पेन्शन परतीच्या नोटिसीला ठेंगा दाखवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांबाबत कडक धोरण अवलंबिणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत सव्वा कोटी रुपये वसूल

पंतप्रधान किसान पेन्शन योजनेंतर्गत करदात्या शेतकऱ्यांकडून तालुका व जिल्हा प्रशासनाकडून हे पैसे परत घेतले जात आहेत. आतापर्यंत ४ हजार ९०० शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यानुसार केवळ १२१६ शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून, त्यांच्याकडून १ कोटी १४ लाख १६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून दोन ते तीन वेळेस पैसे भरण्याबाबत नोटीस पाठवण्यात आल्या. मात्र करदात्या शेतकऱ्यांकडून प्रशासनाच्या या नोटिसीला प्रतिसाद मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

११०० शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही

खरीप व रब्बी हंगामात मागील दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान किसान पेन्शन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात. मात्र अद्यापही जिल्ह्यातील जवळपास ११०० शेतकऱ्यांना केवळ किरकोळ त्रुटीमुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. विशेष म्हणजे महसूल प्रशासनातील तलाठी व ग्रामसेवकांकडे संबंधित शेतकऱ्यांनी अनेकवेळा आधार कार्ड, सातबारा यासह इतर कागदपत्रे जमा केले आहेत. मात्र अद्यापही अकराशे शेतकरी या योजनेपासून वंचित आहे, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.