शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत ३० टक्के पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST

परभणी : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर १०० टक्के भरलेल्या मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये अवघ्या चार महिन्यांत ३० टक्के पाण्याचा उपसा ...

परभणी : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीनंतर १०० टक्के भरलेल्या मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये अवघ्या चार महिन्यांत ३० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, आगामी उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प, गाव तलाव आणि मध्यम- लघू प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी भासेल, अशी अपेक्षा आहे. मात्र प्रकल्पांमध्ये साठा झालेल्या पाण्याचा उपसा करण्याचा वेग कसा आहे? यावर पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात १६.९६५ दलघमी पाणीसाठा शिल्लक रााहिला आहे. त्याची टक्केवारी ६८.१ टक्के आहे. या प्रकल्पातून चार महिन्यांमध्ये ३२ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे, तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात २५.९४ दलघमी पाणी शिल्लक असून, या प्रकल्पातून ३० टक्के पाण्याचा आतापर्यंत उपसा झाला आहे. दोन्ही मध्यम प्रकल्पांवर अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना चालतात. त्याचप्रमाणे शेतीच्या सिंचनासाठी पाणी दिले जाते. यावर्षीच्या रबी हंगामात या प्रकल्पातून मुबलक पाणी मिळाल्याने रबी हंगामात पिकांची स्थिती चांगली आहे.

गोदावरी नदीवरील बंधारेही पावसाळ्यात पाण्याने तुडुंब झाले होते. मात्र या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला आहे. पाथरी येथील ढालेगाव बंधाऱ्यातून २४ टक्के, मुदगल बंधाऱ्यातून ३८ टक्के, तारुगव्हाण बंधाऱ्यातून ३१ टक्के आणि डिग्रसच्या उच्च पातळी बंधाऱ्यातून २९ टक्के पाण्याचा चार महिन्यांमध्ये उपसा झाला आहे. सध्या ढालेगाव बंधाऱ्यात ९.९८, मुदगल बंधाऱ्यात ७.०६, तारुगव्हाण १०.३८ आणि डिग्रस बंधाऱ्यात ४५.५५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

लघू प्रकल्पांतून सर्वाधिक पाणी उपसा

जिल्ह्यात २२ लघू प्रकल्प आहेत. त्या भागातील गावांची पाणीपुरवठ्याची जबाबदारी या प्रकल्पांवर आहे. मात्र या प्रकल्पांतून ६६ टक्के पाण्याचा उपसा आतापर्यंत झाला आहे. या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीला १४.५१ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. २२ लघू प्रकल्पांमध्ये एका प्रकल्पातील पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असलेले दोन प्रकल्प आहेत. सात प्रकल्पांत २६ ते ५० टक्के, १० प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के आणि दोन प्रकल्पांत ७६ ते १०० टक्के पाणीसाठा आहे.

मोठ्या प्रकल्पांतील जीवंत पाणीसाठा

येलदरी : ६८०.४४ ८४ टक्के

निम्न दुधना : २०४.६७२ ८४.५ टक्के

करपरा मध्यम : १६.९६ ६८.१ टक्के

मासोळी मध्यम : १९.०० ७० टक्के