शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:40 IST

१२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग वाढल्याचा परिणाम

परभणी: गंगाखेड शहरात एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने निर्णय घेत परभणी जिल्ह्यामध्ये १२ जुलै रात्री १२ वाजेपासून ते १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर रुग्णसंख्या अधिक असलेल्या गंगाखेड तालुक्यात १९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. यापूर्वी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेपासून ते १२ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच आता परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना आणखी तीन दिवस आणि गंगाखेडकरांना ८ दिवस लॉकडाऊन करावे लागणार आहे. या संचारबंदी काळात नेहमीप्रमाणेच सर्व शासकीय कार्यालय, त्यांची वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, आपद्कालीन सेवा, अन्न वाटप करणारे वाहने, अत्यावश्यक परवाने घेतलेली व्यक्ती, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वार्ताहर, प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस वितरक कर्मचाºयांना सूट राहणार आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ या काळात घरोघर जावून दुध विक्री करता येईल. केवळ राष्ट्रीयकृत बँका सुरु राहतील. त्यादेखील रास्तभाव दुकानदार,पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक व महावितरण कंपनीकडून येणारे चलन स्वीकारणार आहे. 

आतापर्यंतची संचारबंदी नावालाचया महिन्यात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा संचारबंदी लावण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र या काळातील अनुभव पाहता केवळ कागदोपत्रीच संचारबंदीचा अंमल होत असून प्रत्यक्षात बाजारपेठा बंद आणि रस्त्यावर वर्दळ सुरु अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी स्वत:हून घराबाहेर पडू नये, असे अपेक्षित असले तरी नियम झुगारुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातही मागील संचारबंदी काळात एकाही प्रशासकीय यंत्रणेने घराबाहेर पडलेल्या नागरिकाला तो घराबाहेर का आला ? खरेच त्याचे अत्यावश्यक काम आहे का? याविषयी विचारपूस केली नाही. अंमलबजावणी करणारी यंत्रणाच गायब असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा कोणताही थाट नागरिकांना नव्हता. परिणामी संचारबंदीतही बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मुक्त संचार दिसून आला. त्यामुळे अशा संचारबंदीने कोरोनाचा फैलाव थांबला जाईल का? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करताना त्याची तेवढीच काटेकोर अंमलबजावणीही केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या