शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:40 IST

१२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग वाढल्याचा परिणाम

परभणी: गंगाखेड शहरात एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने निर्णय घेत परभणी जिल्ह्यामध्ये १२ जुलै रात्री १२ वाजेपासून ते १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर रुग्णसंख्या अधिक असलेल्या गंगाखेड तालुक्यात १९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. यापूर्वी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेपासून ते १२ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच आता परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना आणखी तीन दिवस आणि गंगाखेडकरांना ८ दिवस लॉकडाऊन करावे लागणार आहे. या संचारबंदी काळात नेहमीप्रमाणेच सर्व शासकीय कार्यालय, त्यांची वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, आपद्कालीन सेवा, अन्न वाटप करणारे वाहने, अत्यावश्यक परवाने घेतलेली व्यक्ती, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वार्ताहर, प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस वितरक कर्मचाºयांना सूट राहणार आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ या काळात घरोघर जावून दुध विक्री करता येईल. केवळ राष्ट्रीयकृत बँका सुरु राहतील. त्यादेखील रास्तभाव दुकानदार,पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक व महावितरण कंपनीकडून येणारे चलन स्वीकारणार आहे. 

आतापर्यंतची संचारबंदी नावालाचया महिन्यात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा संचारबंदी लावण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र या काळातील अनुभव पाहता केवळ कागदोपत्रीच संचारबंदीचा अंमल होत असून प्रत्यक्षात बाजारपेठा बंद आणि रस्त्यावर वर्दळ सुरु अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी स्वत:हून घराबाहेर पडू नये, असे अपेक्षित असले तरी नियम झुगारुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातही मागील संचारबंदी काळात एकाही प्रशासकीय यंत्रणेने घराबाहेर पडलेल्या नागरिकाला तो घराबाहेर का आला ? खरेच त्याचे अत्यावश्यक काम आहे का? याविषयी विचारपूस केली नाही. अंमलबजावणी करणारी यंत्रणाच गायब असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा कोणताही थाट नागरिकांना नव्हता. परिणामी संचारबंदीतही बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मुक्त संचार दिसून आला. त्यामुळे अशा संचारबंदीने कोरोनाचा फैलाव थांबला जाईल का? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करताना त्याची तेवढीच काटेकोर अंमलबजावणीही केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या