शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

२४ टक्के रुग्णांचा ४ ते ७ दिवसांमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २१९ रुग्णांचा ४ ते ७ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला असून, हे प्रमाण ...

परभणी : कोरोनावर उपचार घेणाऱ्या २१९ रुग्णांचा ४ ते ७ दिवसांच्या कालावधीत मृत्यू झाला असून, हे प्रमाण एकूण मृत्यूच्या २४.५२ टक्के एवढे आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १३ मेपर्यंत जिल्ह्यातील ८९३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूच्या कालावधीचा विचार करता सर्वाधिक २१९ रुग्णांचा मृत्यू हा त्यांना कोरोना झाल्यानंतर ४ ते ७ दिवसांच्या दरम्यान झाला आहे. त्याचे प्रमाण २४ टक्के एवढे आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ५७ महिला तर १६२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आरोग्य विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा निष्पन्न झाल्यानंतर केवळ २४ तासांतच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही १६५ एवढी असून, हे प्रमाण १८.४८ टक्के एवढे आहे. तर कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या १९० एवढी आहे. २१२ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांच्या कालावधीत झाला आहे. मृत्यू पावलेल्या या रुग्णांमध्ये ६५ महिला आणि १४७ पुरुषांचा समावेश आहे. तर १४ दिवसांनंतर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०७ एवढी असून, त्याचे प्रमाण ११.९८ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यातही कोरोना निष्पन्न झाल्यानंतर चौथ्या ते सातव्या दिवसापर्यंत रुग्णांना धोका अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसते. या काळात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. १३ मेपर्यंत जिल्ह्यात ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये २८९ महिला आणि ६०१ पुरुषांचा समावेश आहे.