शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सप्ताहात महापंगतीमधील भगरीच्या प्रसादातून २२५ जणांना विषबाधा

By मारोती जुंबडे | Updated: February 7, 2024 17:25 IST

या रुग्णांमध्ये ८ वर्षीय बालकांपासून ते ६० वर्षीय नागरिकांचा समावेश आहे.

परभणी: तालुक्यातील सोन्ना येथे आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथे दरम्यान महापंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचे सेवन केलेल्या २२५ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री १  वाजेच्या सुमारास समोर आला. या सर्व रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

सोन्ना ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १ फेब्रुवारीपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता ८ फेब्रुवारी रोजी हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाने होणार आहे. परंतु, ६ फेब्रुवारी रोजी हभप माऊली महाराज मुडेकर यांच्या कीर्तनानंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.  परंतु, एकादशी असल्याने ग्रामस्थांसाठी आयोजकांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास भगरीचा प्रसाद तयार केला होता. हा महाप्रसाद ग्रामस्थांनी सेवन केल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास लहान बालकांसह वयोवृद्ध ग्रामस्थांना उलटी व मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले.

परंतु, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास रुग्णांची संख्या २२५ वर जाऊन पोहोचली. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार यांनी तज्ञ डॉक्टरांसह रुग्णांकडे धाव घेतली. त्यानंतर रुग्णांवर योग्य तो उपचार करून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले.  बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉ. लखमवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी दिली भेटसोन्ना येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह दरम्यान असलेल्या महापंक्तीतील प्रसादातून विषबाधेचा प्रकार समोर आला. त्यानंतर ही माहिती ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिली. माहिती मिळतात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, तहसीलदारांसह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोन्ना येथे मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास धाव घेऊन भेट दिली. तसेच ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

आठ ते साठ वर्ष रुग्णांचा समावेशसप्ताह सांगतेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आयोजित महाप्रसादातून परभणी तालुक्यातील सोन्ना येथील २२५  ग्रामस्थांना विषबाधा झाली.  या सर्व ग्रामस्थांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांमध्ये ८ वर्षीय बालकांपासून ते ६० वर्षीय नागरिकांचा समावेश आहे. या घटनेने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीfood poisoningअन्नातून विषबाधा