शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पाण्याच्या दाबाने पूर्णा नदीपात्रातील २ कोटीचा बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 19:50 IST

येलदरी धरणाच्या पायथ्याला पूर्णा नदी पात्रात पाटबंधारे विभागाने चिंचखेडा, घडोळी तांडा येथे बंधारे बांधले आहेत.

ठळक मुद्दे२०११ मध्ये चिंचखेडा येथील बंधाऱ्यावर २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आला शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार

जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील चिचखेडा येथे २ कोटी २२ लाख रुपये खर्चून बांधलेला बंधारा येलदरी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे फुटला असून,  २५ गावांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

येलदरी धरणाच्या पायथ्याला पूर्णा नदी पात्रात पाटबंधारे विभागाने चिंचखेडा, घडोळी तांडा येथे बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यामुळे सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, सावळी, घडोळी, घडोळी तांडा, गणेशनगर, यनोली, यनोली तांडा, खोलघाडगा, लिंबाळा, लिंबाळा तांडा, तांदळवाडी, मुरूमखेडा, चिंचखेडा, आमदरी, केहाळ आदी गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आली आहे. 

२०११ मध्ये चिंचखेडा येथील बंधाऱ्यावर २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आला; परंतु बंधाऱ्याचे काम थातूरमातूर झाले. बंधाऱ्याच्या दरवाजांचे रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने दरवाजेही बसविले नाहीत. त्यामुळे कोट्यवधी लिटर पाणी वाहून जात आहे. येलदरी धरण १०० टक्के भरल्याने अनेक वेळा पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. पाण्याच्या प्रवाहाचा ताण सहन न झाल्याने या बंधाऱ्याच्या भिंतीखालील भाग वाहून गेला आहे. त्याचप्रमाणे स्लॅबही वाहून गेला आहे. त्यामुळे रबी सिंचनाचा प्रश्न  निर्माण झाला आहे. बंधाऱ्याच्या अवस्थेकडे लक्ष देण्यास पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना लक्ष नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. 

टॅग्स :Damधरणparabhaniपरभणी