शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

१७0 गावांत टंचाईमुक्तीचे प्रयत्न

By admin | Updated: March 4, 2015 15:37 IST

शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

परभणी : शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. शासन आणि प्रशासनाने दाखविलेले टंचाईमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रारंभ झाला आहे. तलाव, सिमेंट नाला बंधार्‍यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. लघू, मध्यम आणि गाव तलाव असे एकूण ६0 तलाव जिल्ह्यात असून, त्यापैकी १६ तलावांमधील ३लाख ६६ हजार ६0८ घनमीटर गाळ आतापर्यंत उपसण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५१ सिमेंट नाला बंधार्‍यातील ५३ हजार २४0 घन मीटर गाळ काढण्यात आला. परभणी तालुक्यातील पेडगाव आणि गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी या दोन ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हे काम सुरू आहे. गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करावयाचे असले तरी त्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अडचणी सोडवून कामांना गती देण्याचे कसब जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

१६ तलावांचे काम सुरू- सध्या जिल्ह्यात १६ तलावांतील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून सुरू आहे. त्यात परभणी तालुक्यात पेडगाव आणि भोगाव, गंगाखेड तालुक्यात कोद्री, डोंगरगाव, मासोळी, खंडाळी, पिंपळदरी, गुंजेगाव, जिंतूर तालुक्यात येनोली, चारठाणा, वरुड, सेल तालुक्यात हादगाव, तांदुळवाडी, इटोली, बेलखेडा आणि सोनपेठ तालुक्यात वडाळी येथे हे काम सुरू आहे.अडीचशे हेक्टरचे पुनर्जीवनजलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत ५१ सिमेंट नाला बंधार्‍यातून ५३ हजार २४0 घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ४२0 टीसीएम वाढीव पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यातून २५0 हेक्टर जमिनीचे पुनर्जीवन होईल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.

योजनेत अडचणी..- तलावातील गाळ उपसण्याची कामे लोकसहभागातून करावयाची आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना गाळ वाहून नेण्याचाच खर्च येऊ शकतो. परंतु गाळ उपसण्यासाठी लागणार्‍या जेसीबी मशीन व अन्य मशिनरीचा खर्च मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे काही काळापुरतीच मोफत गाळ उपसला जातो व त्यानंतर मात्र मशिनरींचा खर्च परवडत नसल्याने नाविलाजास्तव शेतकर्‍यांकडून पैसे घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकर्‍यांना संपूर्णत: मोफत गाळ मिळावा यासाठी शासन व प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. अधिकारी- कर्मचार्‍यांनी या मोहिमेसाठी हातभार लावणे गरजेचे आहे.