शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परभणीसाठी १५ हजार क्विंटल बियाणांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST

खरीप हंगामाच्या अनुषंगाने परभणी येथील महाबीजच्या कार्यालयात आ. डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी कृषी व महाबीजच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक ...

खरीप हंगामाच्या अनुषंगाने परभणी येथील महाबीजच्या कार्यालयात आ. डॉ. राहुल पाटील यांनी सोमवारी कृषी व महाबीजच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले की, या वर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार आहे, तर कपाशीचा पेरा जास्त होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व भार सोयाबीनवर येणार असल्याची परिस्थिती आहे. परिणामी, सोयाबीनची मागणी वाढणार आहे. त्यामुळे बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासाठी आत्ताच तयारी करावी लागेल. शेतकऱ्यांना हे बी-बियाणे उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी आपला प्रस्ताव महाबीजकडे पाठवावा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावार यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांना जिल्ह्यातील बियाणांची आवश्यकता सांगितली. यावेळी रेखावार यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महाबीजकडे १५ हजार क्विंटल बियाणे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी सोयाबीनच्या बियाणांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांपुढे संकट निर्माण झाले होते. यावर्षी अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, तालुका प्रमुख नंदू अवचार, दिनेश बोबडे, उपशहर प्रमुख संभानाथ काळे, नगरसेवक सुशील कांबळे, विक्की सोनेकर, अशोक गव्हाणे, प्रकाश डहाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.