शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१

By मारोती जुंबडे | Updated: April 18, 2023 16:49 IST

ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

परभणी : शेतकऱ्यांना शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनाने १४६२ कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये १२९७ कामांना प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८४१ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक शेती अवजारांची ने-आण करावी लागते. त्याचबरोबर पीक कापणी व काढणी केल्यानंतर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेत बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्याचबरोबर रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत आहेत. या सर्व तंट्यांना आळा घालून शेतकऱ्यांना शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, या हेतूने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १४६५ रस्त्यांना मंजुरी दिली. हे रस्ते पावसाळ्याअगोदर झाले तर शेतकऱ्यांना सोयीच्या होणार आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत १२९७ कामांनाच प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ ८४१ कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धीचे पाणंद रस्ते योजनेवर करण्यात येणारा लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनयोग होऊन शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

१४६५ कामांना मंजुरीमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४६२ शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

१२९७ कामांना मान्यतामातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ९ तालुक्यांत १४६२ कामांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता केवळ १२९७ कामांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर जिल्हा प्रशासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे उरकून घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१२९७ कामांना कार्यारंभ; सुरू केवळ ८४१ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत १४६२ रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी आतापर्यंत प्रशासनाकडून १२९७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यावरूनही प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या सर्वच्या सर्व १३९७ कामांना कार्यारंभ आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र ८४१ कामे सुरू आहेत. आज स्थितीत ६२१ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याअगोदर ही कामे झाली तर शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणार आहे.

कोणत्या तालुक्यात काय स्थितीतालुका मंजुरी मान्यता कार्यारंभ सुरूगंगाखेड १७० १५५ १५५ १०५जिंतूर २४९ २३७ २३७ ९०मानवत १०७ ८१ ८१ ३८पालम १०५ ६० ६० ५३परभणी २८४ २७५ २७५ १६५पाथरी ११९ १०२ १०२ ३८पूर्णा १८४ १५९ १५९ १२४सेलू १८५ १७५ १७५ १७५सोनपेठ ६९ ५३ ५३ ५३एकूण १४६२ १२९७ १२९७ ८४१

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आढावापाणंद रस्ते मंजुरी.....................१४६२प्रशासकीय मान्यता......................१२९७कार्यारंभ आदेश........................१२९७कामे सुरू ..................................८४१अद्याप सुरू न झालेली कामे.................६२१

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी