शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१

By मारोती जुंबडे | Updated: April 18, 2023 16:49 IST

ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

परभणी : शेतकऱ्यांना शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनाने १४६२ कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये १२९७ कामांना प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८४१ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक शेती अवजारांची ने-आण करावी लागते. त्याचबरोबर पीक कापणी व काढणी केल्यानंतर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेत बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्याचबरोबर रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत आहेत. या सर्व तंट्यांना आळा घालून शेतकऱ्यांना शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, या हेतूने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १४६५ रस्त्यांना मंजुरी दिली. हे रस्ते पावसाळ्याअगोदर झाले तर शेतकऱ्यांना सोयीच्या होणार आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत १२९७ कामांनाच प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ ८४१ कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धीचे पाणंद रस्ते योजनेवर करण्यात येणारा लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनयोग होऊन शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

१४६५ कामांना मंजुरीमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४६२ शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

१२९७ कामांना मान्यतामातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ९ तालुक्यांत १४६२ कामांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता केवळ १२९७ कामांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर जिल्हा प्रशासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे उरकून घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१२९७ कामांना कार्यारंभ; सुरू केवळ ८४१ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत १४६२ रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी आतापर्यंत प्रशासनाकडून १२९७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यावरूनही प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या सर्वच्या सर्व १३९७ कामांना कार्यारंभ आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र ८४१ कामे सुरू आहेत. आज स्थितीत ६२१ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याअगोदर ही कामे झाली तर शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणार आहे.

कोणत्या तालुक्यात काय स्थितीतालुका मंजुरी मान्यता कार्यारंभ सुरूगंगाखेड १७० १५५ १५५ १०५जिंतूर २४९ २३७ २३७ ९०मानवत १०७ ८१ ८१ ३८पालम १०५ ६० ६० ५३परभणी २८४ २७५ २७५ १६५पाथरी ११९ १०२ १०२ ३८पूर्णा १८४ १५९ १५९ १२४सेलू १८५ १७५ १७५ १७५सोनपेठ ६९ ५३ ५३ ५३एकूण १४६२ १२९७ १२९७ ८४१

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आढावापाणंद रस्ते मंजुरी.....................१४६२प्रशासकीय मान्यता......................१२९७कार्यारंभ आदेश........................१२९७कामे सुरू ..................................८४१अद्याप सुरू न झालेली कामे.................६२१

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी