शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१

By मारोती जुंबडे | Updated: April 18, 2023 16:49 IST

ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

परभणी : शेतकऱ्यांना शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनाने १४६२ कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये १२९७ कामांना प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८४१ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक शेती अवजारांची ने-आण करावी लागते. त्याचबरोबर पीक कापणी व काढणी केल्यानंतर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेत बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्याचबरोबर रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत आहेत. या सर्व तंट्यांना आळा घालून शेतकऱ्यांना शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, या हेतूने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १४६५ रस्त्यांना मंजुरी दिली. हे रस्ते पावसाळ्याअगोदर झाले तर शेतकऱ्यांना सोयीच्या होणार आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत १२९७ कामांनाच प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ ८४१ कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धीचे पाणंद रस्ते योजनेवर करण्यात येणारा लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनयोग होऊन शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

१४६५ कामांना मंजुरीमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४६२ शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

१२९७ कामांना मान्यतामातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ९ तालुक्यांत १४६२ कामांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता केवळ १२९७ कामांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर जिल्हा प्रशासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे उरकून घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१२९७ कामांना कार्यारंभ; सुरू केवळ ८४१ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत १४६२ रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी आतापर्यंत प्रशासनाकडून १२९७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यावरूनही प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या सर्वच्या सर्व १३९७ कामांना कार्यारंभ आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र ८४१ कामे सुरू आहेत. आज स्थितीत ६२१ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याअगोदर ही कामे झाली तर शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणार आहे.

कोणत्या तालुक्यात काय स्थितीतालुका मंजुरी मान्यता कार्यारंभ सुरूगंगाखेड १७० १५५ १५५ १०५जिंतूर २४९ २३७ २३७ ९०मानवत १०७ ८१ ८१ ३८पालम १०५ ६० ६० ५३परभणी २८४ २७५ २७५ १६५पाथरी ११९ १०२ १०२ ३८पूर्णा १८४ १५९ १५९ १२४सेलू १८५ १७५ १७५ १७५सोनपेठ ६९ ५३ ५३ ५३एकूण १४६२ १२९७ १२९७ ८४१

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आढावापाणंद रस्ते मंजुरी.....................१४६२प्रशासकीय मान्यता......................१२९७कार्यारंभ आदेश........................१२९७कामे सुरू ..................................८४१अद्याप सुरू न झालेली कामे.................६२१

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी