शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील विकास कामांना 134 कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:57 IST

सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविकास कामांसाठी निधीची गरज

परभणी :  राज्याच्या वित्त विभागाने जिल्हा वार्षिक योजनांसाठी १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्याला या निर्णयानुसार १३४ कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. कोरेानाच्या संकटामुळे सात महिन्यांपासून ठप्प असलेल्या विकास योजनांसाठी आता या निधीची प्रतीक्षा सुरू झाली आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास योजना राबविल्या जातात. शिक्षण, आरोग्य, रोजगार या योजनांसह भौतिक सुविधाही नियोजनच्या निधीतून उपलब्ध केल्या जात आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी करावयाच्या योजनांचा आराखडा तयार केला जातो. यावर्षी एप्रिल महिन्यात जिल्हा  नियोजन समितीचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला. 

सुमारे २०० कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र विकास आराखडा तयार झाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यामुळे सर्व योजना ठप्प आहेत. याच काळात राज्य शासनाने विकास कामांवरील निधीला कात्री लावली. नियोजन समित्यांना एकूण तरतुदीच्या ३३ टक्केच निधी वितरित करण्यात आला असून, यातील बहुतांश निधी कोरोनाच्या संकटासाठी आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

जिल्हा नियोजन समितीला यावर्षी ३३ टक्क्यांप्रमाणे ६६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी २० कोटी ९ लाख रुपये कोरोनासाठी आरोग्य विभागाला देण्यात आले. उर्वरित निधी विकास योजनांवर खर्च करू नये, अशा सूचना असल्याने विकास कामे ठप्प आहेत. शिल्लक राहिलेल्या निधीतून जुन्या कामांवर खर्च केला जात आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील विकास कामे ठप्प असून, उर्वरित ६७ टक्के निधीची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे. याच दरम्यान, राज्याच्या वित्त विभागाचे सहसिचव व.कृ. पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनांसाठी १०० टक्के निधी वितिरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्याला १३४ कोटी रुपयांची प्रतीक्षा लागली आहे. 

जिल्ह्यातील विकास कामे सध्या ठप्पचजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांनी विकास कामांचे नियोजन केले आहे. तसा आराखडाही सादर करण्यात आला आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने सध्या तरी ही कामे ठप्प आहेत. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा लागली आहे. 

नियोजन विभाग सुधारित सूचना करणारवित्त विभागाने १०० टक्के निधी वितरित करण्याचा निर्णय घेलता असला तरी नियोजन विभागातून अद्याप तशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. निधी वितरित करताना नियोजन विभागातून मार्गदर्शक सुधारित सूचना दिल्या जातील. त्यानुसार निधी प्राप्त झाल्यानंतर इतर यंत्रणांना तो वितरित केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी