शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात मास्क न लावणाऱ्या १२ हजार नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:16 IST

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांना पोलीस प्रशासनाने दंड ...

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संसर्ग काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांना पोलीस प्रशासनाने दंड सुनावला आहे. त्यातून २५ लाख १९ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आला.

गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासही प्रतिबंध केला होता. याच काळात सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाले. हळूहळू व्यवहार सुरू झाल्यानंतरही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. मागील संपूर्ण वर्षभरात पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही अनेक नागरिक या आवाहनाला प्रतिसाद न देता विना मास्क फिरत असल्याचे निदर्शनास आले.

पोलीस प्रशासनाने मागील वर्षभराच्या काळात मास्कचा वापर न करणाऱ्या १२ हजार ५९८ नागरिकांकडून प्रति नागरिक २०० रुपये या प्रमाणे २५ लाख १९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

२० हजार ७७९ वाहनधारकांवर केेसेस

कोरोनाचा संसर्ग सुरू असतानाच वाहतुकीचे नियम डावलत वाहनधारक शहरातील रस्त्यांवरून फिरत होते. अशा २० हजार ७७९ वाहन चालकांविरुद्ध मागील वर्षात वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. या वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परभणी शहरात सर्वाधिक दंड वसूल

जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने जी कारवाई केली. विशेष म्हणजे परभणी शहरातच अनेक नागरिक विना मास्क फिरताना आढळले. पोलीस प्रशासनाबरोबरच महानगरपालिकेच्या पथकानेही शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया परभणीत झाल्या.

५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांवर कारवाई

कोरोनाच्या संसर्ग काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. कोरोना वाढू नये, या उद्देशाने ही अंमलबजावणी केली जात असताना काही नागरिक मात्र प्रशासनाचे नियम डावलत रस्त्यांवरून फिरत होते. अशा नागरिकांची वाहने जप्त करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी कारवाईदेखील करण्यात आली आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यांपर्यंत ४ हजार ६६१ नागरिकांविरुद्ध फौजदारी प्रतिबंधित संहिता कलम १०७ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच २२ नागरिकांविरुद्ध कलम १०९ प्रमाणे तर १९५ नागरिकांविरुद्ध कलम ११० नुसार कारवाई करण्यात आली. विना परवानगी आंदोलने करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.

बिनधास्तपणा वाढला...

मागील महिनाभरापासून काेरोनाचा संसर्ग वाढत असला तरी नागरिकांचा बिनधास्तपणाही वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नियम डावलले जातात.

कोरोनाचा संसर्ग आता पुन्हा वाढला आहे. पोलीस प्रशासनाने नियम डावलणाऱ्या नागरिकांविरुद्ध पुन्हा एकदा कारवाया सुरू केल्या आहेत. शहरामध्ये विविध भागांत फिक्स पॉईंट लावून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे यावेळेस मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्त मोहीम राबविली जात आहे.