शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ११६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या ...

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषत: शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक वेगाने फैलावल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना परभणी जिल्ह्यातील ११६ गावांनी सर्वच इतर गावांना चकित केले आहे. या गावांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेमध्ये एकही कोरोनाबधित रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे तसेच मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर आदी बाबी या गावांमधील ग्रामस्थांनी कटाक्षाने पाळल्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करणे तसेच त्याची योग्य ती काळजी घेणे आदींबाबतही दक्षता सामूहिक प्रयत्नातून घेण्यात आली. परिणामी देशभरात धुमाकूळ घालणारा कोरोना या गावांमध्ये पोहोचू शकला नाही. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, त्यांच्या एकजुटीला आणि कोरोनाबाबतच्या सजगतेला देत आहेत.

गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक गावे

जिल्ह्यात एकूण ११६ गावे कोरोनापासून दूर राहिली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२ गावे गंगाखेड तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ जिंतूर तालुक्यातील २३, पालम तालुक्यातील २२, मानवत व परभणी तालुक्यातील प्रत्येकी ४, पूर्णा तालुक्यातील ६, सेलू तालुक्यातील ५, सोनपेठ तालुक्यातील १२ आणि पाथरी तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करणे, त्यांचे विलगीकरण करणे तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले. दुसऱ्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत संशयितांच्या चाचण्या, लसीकरण जनजागृती आदी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने गाव कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले.

- जनाबाई संतोष खराबे, सरपंच, पार्डी टाकळी, ता. मानवत

कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची चाचणी करूनच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. गावातील प्रत्येकाने मास्क व आणि सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन केले तसेच गावात स्वच्छतेवर भर देण्यात आला. त्यामुळे गाव कोरोनापासून दूर राहिले.

-स्वाती रामेश्वर जाधव, सरपंच, मोहळा, ता. सोनपेठ