शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

जिल्ह्यातील ११६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या ...

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषत: शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक वेगाने फैलावल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना परभणी जिल्ह्यातील ११६ गावांनी सर्वच इतर गावांना चकित केले आहे. या गावांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेमध्ये एकही कोरोनाबधित रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे तसेच मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर आदी बाबी या गावांमधील ग्रामस्थांनी कटाक्षाने पाळल्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करणे तसेच त्याची योग्य ती काळजी घेणे आदींबाबतही दक्षता सामूहिक प्रयत्नातून घेण्यात आली. परिणामी देशभरात धुमाकूळ घालणारा कोरोना या गावांमध्ये पोहोचू शकला नाही. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, त्यांच्या एकजुटीला आणि कोरोनाबाबतच्या सजगतेला देत आहेत.

गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक गावे

जिल्ह्यात एकूण ११६ गावे कोरोनापासून दूर राहिली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२ गावे गंगाखेड तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ जिंतूर तालुक्यातील २३, पालम तालुक्यातील २२, मानवत व परभणी तालुक्यातील प्रत्येकी ४, पूर्णा तालुक्यातील ६, सेलू तालुक्यातील ५, सोनपेठ तालुक्यातील १२ आणि पाथरी तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करणे, त्यांचे विलगीकरण करणे तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले. दुसऱ्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत संशयितांच्या चाचण्या, लसीकरण जनजागृती आदी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने गाव कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले.

- जनाबाई संतोष खराबे, सरपंच, पार्डी टाकळी, ता. मानवत

कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची चाचणी करूनच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. गावातील प्रत्येकाने मास्क व आणि सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन केले तसेच गावात स्वच्छतेवर भर देण्यात आला. त्यामुळे गाव कोरोनापासून दूर राहिले.

-स्वाती रामेश्वर जाधव, सरपंच, मोहळा, ता. सोनपेठ