शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

जिल्ह्यातील ११६ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या ...

देशभरात कोरोनाची पहिली लाट झाली. त्यानंतर दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण एकीकडे वाढत असताना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. विशेषत: शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक वेगाने फैलावल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना परभणी जिल्ह्यातील ११६ गावांनी सर्वच इतर गावांना चकित केले आहे. या गावांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेमध्ये एकही कोरोनाबधित रुग्ण अद्यापपर्यंत आढळलेला नाही. त्यामुळे या गावांचा आदर्श इतर गावांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवून त्यांना विलगीकरणात ठेवणे तसेच मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर आदी बाबी या गावांमधील ग्रामस्थांनी कटाक्षाने पाळल्या. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत संशयित वाटणाऱ्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करणे तसेच त्याची योग्य ती काळजी घेणे आदींबाबतही दक्षता सामूहिक प्रयत्नातून घेण्यात आली. परिणामी देशभरात धुमाकूळ घालणारा कोरोना या गावांमध्ये पोहोचू शकला नाही. याचे सर्व श्रेय येथील ग्रामस्थ, त्यांच्या एकजुटीला आणि कोरोनाबाबतच्या सजगतेला देत आहेत.

गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक गावे

जिल्ह्यात एकूण ११६ गावे कोरोनापासून दूर राहिली. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२ गावे गंगाखेड तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ जिंतूर तालुक्यातील २३, पालम तालुक्यातील २२, मानवत व परभणी तालुक्यातील प्रत्येकी ४, पूर्णा तालुक्यातील ६, सेलू तालुक्यातील ५, सोनपेठ तालुक्यातील १२ आणि पाथरी तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करणे, त्यांचे विलगीकरण करणे तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले. दुसऱ्या लाटेत माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत संशयितांच्या चाचण्या, लसीकरण जनजागृती आदी उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने गाव कोरोनापासून दूर ठेवण्यात यश आले.

- जनाबाई संतोष खराबे, सरपंच, पार्डी टाकळी, ता. मानवत

कोरोनाचा गावात शिरकाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची चाचणी करूनच त्यांना गावात प्रवेश देण्यात आला. गावातील प्रत्येकाने मास्क व आणि सॅनिटायझरचा वापर केलाच पाहिजे, असे सांगण्यात आले. ग्रामस्थांनीही नियमांचे पालन केले तसेच गावात स्वच्छतेवर भर देण्यात आला. त्यामुळे गाव कोरोनापासून दूर राहिले.

-स्वाती रामेश्वर जाधव, सरपंच, मोहळा, ता. सोनपेठ