शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

८२ ग्रा.पं.चा १० कोटींचा निधी विनाखर्च पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विकास निधीबाबत ३३ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले ...

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विकास निधीबाबत ३३ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून १५ वित्त आयोगाच्या स्वरूपात जिल्हा परिषदेमार्फत १० टक्के, पंचायत समिती स्तरावर १० टक्के व उर्वरित ८० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. यामध्ये सेलू तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७४ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी २५ लाख अशाप्रकारे जवळपास १० कोटींचा निधी ८ महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेला आहे. परंतु,हा निधी अद्यापही कुठल्याही विकास कामावर खर्च झालेला नाही. विकास कामातील खर्चात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र शासनाने पीएमएफएस ही प्रणाली कार्यान्वित केली. परंतु, या प्रणालीचा उपयोग कशा पद्धतीने करून खर्च करण्याची प्रक्रिया अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना अद्यापही माहीत नसल्यामुळे हा निधी मागील ८ महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या खात्यात पडून आहे. तर दुसरीकडे सेलू तालुक्यातील नव्याने निवडून आलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या स्वाक्षरी अपडेट करण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे डीएससी अपडेट झाल्याशिवाय हा निधी खर्च कसा होणार असा प्रश्न समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीवर बहुतांश विकास कामे सुरु करण्यास अडचण ठरत होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ग्रामपातळीवर विकास कामे सुरू होणे अपेक्षित असले तरी १५ वित्त आयोगाचा निधी नेमका खर्च कसा करायचा? याबाबत मात्र अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

दोन गटात करावा लागणार खर्च

१५ वित्त आयोगाचा निधी खर्च करताना ग्रामपंचायतीने बंधित स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे पुनर्भरण, आरो मशीन बसवणे, वाढीव पाणीपुरवठा, पाऊस संकलन केंद्र अशा प्रकारचा खर्च करता येणार आहे. तर अबंधित खर्चामध्ये लहान मुलांचे लसीकरण, स्मशानभूमीवर दफनभूमीसाठी जागा खरेदी करणे, देखभाल दुरुस्ती, कुपोषण निर्मूलन, रस्ता बांधकाम व दुरुस्ती, सौर दिवे, मुलांचा पार्क, खेळ, व्यायामाचे साहित्य व ग्रंथालयाची पुस्तके आदी स्वरुपात खर्च करता येणार आहे.

केंद्र शासनाच्या विकसित केलेल्या प्रणालीवर १४ वित्त आयोगाचा निधी पूर्ण खर्च केल्याशिवाय १५ वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही. बहुतांशी ग्रामपंचायतीचा १४ वा वित्त आयोगाचा निधी पूर्ण खर्च झालेला नाही. त्यामुळे अगोदर १४ वित्त आयोग निधी खर्च करण्यास मुदतवाढ दिली असून १५ वित्त आयोग खर्च करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

विष्णू मोरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू.