शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

८२ ग्रा.पं.चा १० कोटींचा निधी विनाखर्च पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विकास निधीबाबत ३३ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले ...

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर विकास निधीबाबत ३३ टक्के कपातीचे धोरण अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून १५ वित्त आयोगाच्या स्वरूपात जिल्हा परिषदेमार्फत १० टक्के, पंचायत समिती स्तरावर १० टक्के व उर्वरित ८० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला. यामध्ये सेलू तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींना पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७४ लाख तर दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी २५ लाख अशाप्रकारे जवळपास १० कोटींचा निधी ८ महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झालेला आहे. परंतु,हा निधी अद्यापही कुठल्याही विकास कामावर खर्च झालेला नाही. विकास कामातील खर्चात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र शासनाने पीएमएफएस ही प्रणाली कार्यान्वित केली. परंतु, या प्रणालीचा उपयोग कशा पद्धतीने करून खर्च करण्याची प्रक्रिया अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना अद्यापही माहीत नसल्यामुळे हा निधी मागील ८ महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या खात्यात पडून आहे. तर दुसरीकडे सेलू तालुक्यातील नव्याने निवडून आलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या स्वाक्षरी अपडेट करण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे डीएससी अपडेट झाल्याशिवाय हा निधी खर्च कसा होणार असा प्रश्न समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपातळीवर बहुतांश विकास कामे सुरु करण्यास अडचण ठरत होती. परंतु, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ग्रामपातळीवर विकास कामे सुरू होणे अपेक्षित असले तरी १५ वित्त आयोगाचा निधी नेमका खर्च कसा करायचा? याबाबत मात्र अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

दोन गटात करावा लागणार खर्च

१५ वित्त आयोगाचा निधी खर्च करताना ग्रामपंचायतीने बंधित स्वरूपात पिण्याच्या पाण्याचे पुनर्भरण, आरो मशीन बसवणे, वाढीव पाणीपुरवठा, पाऊस संकलन केंद्र अशा प्रकारचा खर्च करता येणार आहे. तर अबंधित खर्चामध्ये लहान मुलांचे लसीकरण, स्मशानभूमीवर दफनभूमीसाठी जागा खरेदी करणे, देखभाल दुरुस्ती, कुपोषण निर्मूलन, रस्ता बांधकाम व दुरुस्ती, सौर दिवे, मुलांचा पार्क, खेळ, व्यायामाचे साहित्य व ग्रंथालयाची पुस्तके आदी स्वरुपात खर्च करता येणार आहे.

केंद्र शासनाच्या विकसित केलेल्या प्रणालीवर १४ वित्त आयोगाचा निधी पूर्ण खर्च केल्याशिवाय १५ वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही. बहुतांशी ग्रामपंचायतीचा १४ वा वित्त आयोगाचा निधी पूर्ण खर्च झालेला नाही. त्यामुळे अगोदर १४ वित्त आयोग निधी खर्च करण्यास मुदतवाढ दिली असून १५ वित्त आयोग खर्च करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

विष्णू मोरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू.