शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

परभणी जिल्ह्यात ३४ लाख २६ हजार वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:57 IST

महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जुलैपासून जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३४ लाख २६ हजार ६७९ वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत परभणी जिल्ह्याला १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जुलैपासून जिल्ह्यामध्ये विविध विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविली जात आहे. ३० जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३४ लाख २६ हजार ६७९ वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.राज्यामध्ये सलग चार वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर नामी उपाय म्हणून राज्य शासनाने मागील तीन वर्षापासून वृक्ष लागवड मोहीम सुरु केली आहे. या योजनेंतर्गत २०१६ या वर्षी द्विकोटी वृक्ष लागवड मोहीम राबविली. त्यामध्ये परभणी जिल्ह्याला २ लाख ८४ हजार ४८० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २०१८ मध्ये १३ वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर २०१९ म्हणजेच यावर्षी राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जुलै महिन्याच्या १ तारखेपासून परभणी जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीस जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात वृक्ष लावून या मोहिमेचे उद्घाटन झाले. त्यानंतर ८ दिवस वन विभागाने परिश्रम करीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी वृक्ष लावले आहेत; परंतु, १ जुलैनंतर जिल्ह्यातून पाऊस गायब झाला. त्यामुळे जिल्ह्यात सुरु असलेल्या वृक्ष लागवडीस ब्रेक बसला़ परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप पावसाने हजेरी लावली आहे. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय विभाग आणि सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थांनी वृक्ष लागवड करण्यास पुढाकार घेत वृक्ष लागवड सुरू केली आहे़ वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. या मुदतीत जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.३३ टक्के वृक्षांची लागवड४पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत; परंतु, जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या कमी-अधिक पावसामुळे वृक्ष लागवडीला वारंवार ब्रेक लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२.७२ टक्के वृक्ष लागवड करण्यात आली आहे.४यामध्ये सर्वाधिक वन विभागाने १७ लाख ७० हजार २८० वृक्षांची लागवड केली आहे. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाने ५ लाख ४ हजार ८००, कृषी विभागाने १ लाख १ हजार ९३१, रेशीम उद्योग विभागाने १ लाख ४३ हजार वृक्षांचे रोपण केले आहे. येत्या काळात प्रशासकीय विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल, असा आशावाद आहे.वन महोत्सवालातील स्टॉललाही मिळाला प्रतिसाद४जिल्ह्यात मागील तीन वर्षात दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज ओळखून वन विभागाने वन महोत्सवांतर्गत सर्व सामान्य नागरिकांना व सेवाभावी संस्थांना वृक्ष लागवडीसाठी स्टॉल लावले होते.४ या स्टॉलमधून नागरिकांना अल्पदरामध्ये रोपट्यांची विक्री १ जुलै पासून करण्यात येत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या स्टॉलमधून वृक्ष विक्री केली जाणार आहे. या वन महोत्सवातील स्टॉललाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार