शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 15:44 IST

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील ...

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथे शिरगांव दशक्रोशीतील वारकरी माऊली, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमून हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिरगाव येथून गेली कित्येक वर्षे वारकरी माऊली पायी दिंडीत सहभागी होत आहेत. 

यावर्षी शिरगांव गावातूनच माघवारीची समता पायी दिंडी सुरू व्हावी अशी येथील वारकरी माऊलींची इच्छा होती ती इच्छा शुक्रवार १२ जानेवारी रोजी पूर्ण झाली याचा आम्हा विठ्ठल भक्तांना अपार आनंद होत आहे. अशा प्रतिक्रिया वारीतील माऊलींनी दिल्या. ही दिंडी पुढे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघवारी समता पायी दिंडीमध्ये कणकवली येथे सहभागी होणार आहे.

शिरगांव येथील दिंडीत अबाल वृद्धांसह तरूण महिला, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिरगांव बाजारपेठ येथे दिंडी ‘चालली चालली...चालली...पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरीनामाचा’ यासारखा अभंग गात विठुनामाच्या जयघोषात रिंगण केले होते. एकूणच माघवारीचा समता पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. तर वारकरी माऊलींचा चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी समता, बंधुभावाची दिलेली शिकवण आजच्या पिढीकडे संक्रमित व्हावी, तरूणांनी अध्यात्माकडे वळावे, वारकरी सांप्रदायाचा वेगाने प्रसार व्हावा, सामाजिक सलोखा निर्माण होत असतानाच एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा हे या समता पायी दिंडीच्या माध्यमातून होईल याची खात्री वाटते. त्यामुळे दरवर्षी या माघवारीमध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोक सामील होतात. समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आणि संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या वारीचे आयोजन केले जाते.- सर्वोत्तम साटम, माघवारी समता पायी दिंडी प्रमुख