शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 15:44 IST

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील ...

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथे शिरगांव दशक्रोशीतील वारकरी माऊली, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमून हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिरगाव येथून गेली कित्येक वर्षे वारकरी माऊली पायी दिंडीत सहभागी होत आहेत. 

यावर्षी शिरगांव गावातूनच माघवारीची समता पायी दिंडी सुरू व्हावी अशी येथील वारकरी माऊलींची इच्छा होती ती इच्छा शुक्रवार १२ जानेवारी रोजी पूर्ण झाली याचा आम्हा विठ्ठल भक्तांना अपार आनंद होत आहे. अशा प्रतिक्रिया वारीतील माऊलींनी दिल्या. ही दिंडी पुढे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघवारी समता पायी दिंडीमध्ये कणकवली येथे सहभागी होणार आहे.

शिरगांव येथील दिंडीत अबाल वृद्धांसह तरूण महिला, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिरगांव बाजारपेठ येथे दिंडी ‘चालली चालली...चालली...पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरीनामाचा’ यासारखा अभंग गात विठुनामाच्या जयघोषात रिंगण केले होते. एकूणच माघवारीचा समता पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. तर वारकरी माऊलींचा चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी समता, बंधुभावाची दिलेली शिकवण आजच्या पिढीकडे संक्रमित व्हावी, तरूणांनी अध्यात्माकडे वळावे, वारकरी सांप्रदायाचा वेगाने प्रसार व्हावा, सामाजिक सलोखा निर्माण होत असतानाच एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा हे या समता पायी दिंडीच्या माध्यमातून होईल याची खात्री वाटते. त्यामुळे दरवर्षी या माघवारीमध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोक सामील होतात. समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आणि संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या वारीचे आयोजन केले जाते.- सर्वोत्तम साटम, माघवारी समता पायी दिंडी प्रमुख