शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मरू, पण लढू ! असं का म्हणताहेत इराकी तरुण?

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:00 IST

शिक्षणाची संधी नाही, हाताला काम नाही! स्वातंत्र्यासाठी इराकमधली तरुण मुलं रस्त्यांवर उतरली आहेत..

ठळक मुद्देज्या देशात 25 टक्के तरुण बेरोजगार आहेत, आणि बाकीचे हालाखीत जगत आहेत, तिथं हा तरुण आक्रोश वाढत जाणार हे उघड आहे.

मेघना  ढोके / कलीम  अजीम 

बगदादमधल्या तहरीर स्क्वेअरपासून अगदी जवळ, हाकेच्या अंतरावर एक टोळकं बसून असतं. तरुण पोरं. हातात काहीच नाही. हात मोकळे; पण गळ्याभोवती आणि चेहर्‍यावर इराकी झेंडे गुंडाळलेले.नजरा अशा की, घाला गोळ्या, बघा अजून दुसरं काही जमतंय का?त्यांच्यातलाच एकजण मधूनच घोषणा द्यायला लागतो. तोवर पोलीस, आर्मीवाले येतात, अश्रुधुराचा मारा करायला लागतात. या मुलांनीही लपवलेली गॅसची नळकांडी असतेच, ती ते फोडतात. पळतात. सगळी पांगापांग होते.तेवढय़ात कुणीतरी एक जीव काढून ओरडतो, म्हणतो, ‘आम्ही स्वतंत्र आहोत, इराणचं आमच्यावर राज्य नाही, इथं आमचं राज्य चालतं, आम्हा इराकीचं राज्य चालतं.आणि त्यांचाच एक म्होरक्या, त्याचं नाव अल हमसा हमीद. वय वर्षे 29.  त्यानं एकेकाळी काउण्टरटेररिझम फोर्समध्येही काम केलेलं आहे. 2017 साली मात्र त्यानं नोकरी सोडली. आपलं कुटुंब सावरायचं, एकुलता एक मुलगा, आई-बाप म्हातारे म्हणून चारचौघांसारखं आयुष्य जगायचं म्हणून तो परत आला. हाताला अर्थातच काम नव्हतं. सध्या इराकमध्ये तरुण बेरोजगार हातच जास्त आहेत.मात्र दरम्यान इराक-इराण सत्तासंघर्ष पेटला. इराकमध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि त्यात हमसासारखे अनेक तरुण रस्त्यावर आले. हमसाकडे दहशतवादविरोधी पथकात काम केल्याचा अनुभव होता, तर तो ‘गोली’ बनला. म्हणजे अश्रुधुराची नळकांडी फोडून, पोलीस पळवणं हे त्याचं एक काम.हमसा सांगतो, ‘मरणाची वाट पाहणं आणि मरण पत्करणं यात फरक असतो. देअर इज डिफरन्स बिटवीन वेटिंग टू डाय अ‍ॅण्ड गोईंग टू डाय!’- आम्ही दुसरा पर्याय स्वीकारला आहे.

तीच गोष्ट, नूर हमीद या मुलीची. ती फक्त 18 वर्षाची आहे. डॉक्टर होणार आहे. ती म्हणते, ‘एकदा तुम्ही तहरीर स्क्वेअरमध्ये आलात, तर मागे जायचा काही रस्ताच उरत नाही. मी माघारी फिरणार नाही. माझे आईवडील म्हणतात, डॉक्टर हो, कुठं आंदोलनात जातेस? पण माझ्यासाठी या देशात लोकशाही येणं आणि आज मी या लढय़ात असणंच फार महत्त्वाचं आहे. ’अर्थात सोपं नाही या मुला-मुलींसाठी हे सारं. त्यांना, त्यांच्या घरच्यांना अननोन नंबरवरून फोन येतात. अमका तमका कसा मारला गेला, याच्या कहाण्या सांगितल्या जातात; पण ही मुलं बधायला तयार नाहीत. तसंही गमावण्यासारखं आता त्यांच्याकडे काहीच उरलेलं नाही. भीती वाटावी असंही काही नाही. 2003 मध्ये अमेरिका इराकमध्ये उतरली, युद्ध सुरू झालं. तेव्हा किंवा त्याच्या अगदी आगेमागे जन्माला आलेली ही इराकची तरुण पिढी आहे. त्यांचं सारं लहानपणच रक्ताचा चिखल, बॉम्बहल्ले, पायाखाली सुरुंग हे सारं पाहण्यात गेलं. मरण पाहिलं नाही असा दिवस गेला नाही. आज ते तारुण्यात आलेत तर त्यांच्या हाताला काम नाही. पुरेसं शिक्षण नाही. मुळात सगळे कनिष्ठ वर्गातले, कष्टकरी, कामगार वर्गातल्या पालकांची ही मुलं. त्यांचं लहानपण जळून गेलंच होतं, आता तारुण्यात उपासमारीच समोर आहे. आणि डोक्यावर परकीयांचं गुलाम बनून राहण्याचं संकटही आहे.25 वर्षाची डॉक्टर झालेली बसम म्हणते, जगानं असं समजू नये की, कंगाल, खायला मोताद असलेल्या तरुण मुलांनी उभारलेलं हे आंदोलन आहे. हे उपाशी पोराटोरांचं भुकेपोटी केलेलं आंदोलन नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आमचे जगण्याचे हक्क मागतो आहोत!’हमसा, बसम यांच्यासारखे शेकडो नाहीत तर हजारो तरुण आज इराकच्या रस्त्यांवर आहेत.  गुरुवारी 12 डिसेंबरला झालेल्या ताज्या घटनेत एका 16 वर्षीय तरु णाचा गोळी लागून मृत्यू झालाय. यापूर्वी 6 डिसेंबरला बंदुकीच्या गोळीमुळे तब्बल 25  आंदोलकांचा मृत्यू झाला होता. बगदादच्या तहरीर चौकात एका अज्ञात हल्लेखोराने निदर्शकांवर गोळीबार केला. सरकारविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी शासनप्रायोजित हल्ला असल्याचं उघड बोललं गेलं. आत्तार्पयत इराकच्या लोकशाही लढय़ासाठी 450 हून अधिक तरुणांचे बळी गेले आहेत, तर सुमारे 20 हजारहून अधिक जखमी झालेत. 27 नोव्हेंबरला रॉयटर या न्यूज एजन्सीने काही आंदोलकांच्या प्रतिक्रि या प्रसिद्ध केल्या. त्यात एकजण म्हणतो, ‘आम्ही गेली 16 वर्षे अराजकता आणि भ्रष्टाचारामध्ये जगत आहोत. बसरा हे श्रीमंत शहर आता डम्पिग ग्राउण्ड झालं आहे. सरकारकडून आमच्या अपेक्षा कधीच मावळल्या आहेत, दुसर्‍याच्या इशार्‍यावर चालणारं सरकार आम्हाला नको आहे, लोकशाही सत्ता इराकमध्ये स्थापन व्हावी, असं आम्हाला वाटतं. हे सरकार आता नको, लोकशाही हवी!’हा तरुणांचा विरोध आणि आंदोलन इतकं वाढलं की, जनतेचा क्षोभ शांत करण्यासाठी पंतप्रधान अदिल अब्दुल महदी यांनी राजीनामा दिला. परंतु आंदोलकांनी राजकीय सुधारणेची मागणी लावून धरली आहे. इराकच्या सरकारी कामकाजात इराणचा हस्तक्षेप होता कामा नये, असं आंदोलकांचं मुख्य म्हणणं आहे. नुसता पंतप्रधान बदलून चालणार नाही तर प्रशासन व्यवस्था बदलावी, अशी त्यांची मागणी आहे.ज्या देशात 25 टक्के तरुण बेरोजगार आहेत, आणि बाकीचे हालाखीत जगत आहेत, तिथं हा तरुण आक्रोश वाढत जाणार हे उघड आहे.