शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सिस्टीम’ला तरुण धक्का

By admin | Updated: January 22, 2015 19:26 IST

खरं तर या देशात कसलंही जनरायङोशन अवघड आहे, अगदी तरुण मुलांचे प्रश्न आणि पर्सनॅलिटी यांच्यातही अनेक ठिकाणी जमीन-अस्मानाचं अंतर पडू शकतं. पडतंच!

‘तरुण’ देश.
तरुणांचा देश या संकल्पनेचं एवढं कौतुक कशाला?
तरुण मुलं काय एवढे दिवे लावताहेत?
- असे प्रश्न नेहमी विचारले जातात; पण जगभरातल्या देशांना या ‘तरुण’ देशात काय दिसतं?
कसा दिसतो इथल्या तारुण्याचा स्वभाव?
खरं तर या देशात कसलंही जनरायङोशन अवघड आहे, अगदी तरुण मुलांचे प्रश्न आणि पर्सनॅलिटी यांच्यातही अनेक ठिकाणी जमीन-अस्मानाचं अंतर पडू शकतं. पडतंच!
जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने भारतातली तरुणपिढी हा कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. इंटरनेटवर थोडी शोधाशोध करून पाहिलं, तर भारतातल्या तारुण्याबद्दल हे अभ्यासक काय विचार करतात, हे वाचायला मिळतं. त्यांच्या नजरेतून भारताकडे पाहिलं, तर इथल्या तारुण्याचे तीन महत्त्वाचे स्वभाव दिसतात-
 
1 ) समंजस स्वीकार
शाळेतच शिकवली जाते प्रार्थना, ‘सारे भारतीय माङो बांधव आहेत’. मोठं होता-होता विचार बदलतात, काहींचे चष्मे बदलतात, काहींच्या डोळ्यावर झापडंही चढतात; मात्र तरीही जगभरातल्या तमाम तारुण्याइतकं ‘एकारलेपण’ भारतीय तारुण्यात दिसत नाही. एकतर लहानपणापासून अठरापगड जाती, धर्म, विचारसरण्या, मतंमतांतरं, यातून अनेक गोष्टी कानावर पडत असतात, अवती-भोवती दिसत असतात. शरीराच्या ठेवणीपासून जातीधर्मार्पयत आणि भाषांच्या विविधतेपासून खाण्या-पिण्यार्पयत इतकं पराकोटीचं वैविध्य या देशात आहे की, परस्परांसोबत जगायचं तर एकमेकांना सांभाळून घेत आहे तसं स्वीकारणं हाच समंजस मार्ग असतो. 
ज्या देशात तरुणांची प्रचंड संख्या आहे, त्या देशात इतका सहिष्णुभाव ही जगभराच्या दृष्टीनं अप्रूपाची गोष्ट आहे.
 
2) रस्त्यावरचा संताप, पण विखार नाही!
गप्प बसणं हा भारतीय तारुण्याचा स्वभावच उरलेला नाही. सरकार करेल, कोणीतरी आपल्यासाठी भांडेल हा काळ मागे पडला. आता फेसबुक, व्टिटर, ब्लॉग, यूटय़ूब अशा अनेक मार्गानी हे तारुण्य ‘बोलू’ लागलंय. नियमावर बोट ठेवत कायद्यानं न्याय मागतंय. रस्त्यावर उतरतंय. 
-असं असलं तरीही या देशात अनागोंदी माजलेली नाही, देशातील तारुण्यानं देशातली व्यवस्था मोडीत काढलेली नाही. उलट त्या व्यवस्थेला अधिक प्रभावीपणो काम करायला भाग पाडलं आहे. जेसिका लाल हत्त्याकांड, निर्भया, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचारविरोधी लढा यासा:या चळवळीत तरुणांचा लक्षणीय सहभाग दिसला. त्यातून यंत्रणावर दबाव वाढला आणि अधिक सक्षम व्यवस्था देशात लागू होण्याची निदान सुरुवात तरी झाली.
 
3) यंत्रणोला जोरदार धक्का.
 
तरुण म्हणजे बंडखोरी हे सूत्र. मात्र, असं असलं तरी या देशात तरुणांनी बंड केलं आहे, बंडखोर हाती बंदुका घेऊन आपल्याच सरकारवर चालून गेलेत असं चित्र सरसकट दिसत नाही, याबद्दल परदेशी अभ्यासक सातत्याने लिहिता-बोलताना दिसतात. अर्थात नक्षलवादासारखे प्रश्न देशात असले, तरी अशा उठावांना सरसकट पाठिंबा मिळालेला नाही, हे या अभ्यासकांना विशेष महत्त्वपूर्ण वाटतं. 
 बहुसंख्य तरुण अनेक ठिकाणी, विशेषत: खेडय़ा-पाडय़ात यंत्रणा उत्तम काम कशा करतील, त्यातील दोष दूर होऊन अधिक सक्षम कारभार कसा होईल, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. माहिती अधिकार, तंत्रज्ञान, ऑनलाइन सरकारी कारभार यातून आता अधिक पारदर्शी कारभाराला मदत होत आहे. तरुणांच्या हातात आलेल्या तंत्रज्ञानानं यंत्रणांना जागं करायला सुरुवात केली आहे. लोकशाही राष्ट्रात आजचा तरुण भारतीय नागरिक सहभागातून लोकशाही कारभार हे नवीन सूत्र रूजवायला सुरुवात करत आहे.
 
भारतातली 65 % जनता  35 वर्षे वयाच्या आतली आहे.
 
**
भारतातली 50 % म्हणजे निम्मी लोकसंख्या 25 वर्षे वयाच्या आतली आहे.
 
**
10 ते 24 या वयोगटात 35 कोटी 60 लाख  इतकी लोकसंख्या आहे.
 
***
भारतात आज कुठल्याही शहरात गेलात तर तुम्हाला भेटणा-या दर तीन माणसांत
एक व्यक्ती तरुण असेल.
 
***
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 18 ते 23 वयोगटातल्या 15 कोटी तरुणांनी पहिल्यांदा मतदान केलं. युरोपातले अनेक देश एकत्र केले, तरी एवढी लोकसंख्या होत नाही. इतका हा आकडा मोठा आहे. या नवमतदारांचीच मतं निवडणुकीत सत्ताबदलास कारणीभूत ठरली. देशातलं तख्त बदलवण्याची ताकद  या फस्र्टटाइम व्होटर्सनी सिद्ध केली.
 
***
भारतातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 9क्,क्क्क् तरुण मतदारांनी गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केलं. तरुण म्हणजे ज्यांचं वय 18 ते 22 या दरम्यान आहे.
***
 ज्यांनी पहिल्यांदा आपली नावं मतदार यादीत नोंदवली त्यांची संख्या साधारण 1.79 लाख इतकी होती. त्यापैकी 43 हजार नवमतदार हे 18 ते 19 वयोगटातले होते.
***
या नवीन मतदारांचं वैशिटय़ म्हणजे त्यांच्यावर भूतकाळाचं कोणतंही ओझं नव्हतं.
ना ते कुठल्या विचारसरणीशी बांधलेले होते.
भूतकाळ सोडा, भविष्यात काय कराल हे सांगा, असं म्हणत त्यांनी देशाच्या विकासासाठी मतदान केलं.
भारतीय तारुण्य प्रॅक्टिकल होत, विकास आणि प्रगती या दोन सूत्रंभोवती आपलं जगणं गुंफताना दिसतं.
 
पण तरीही.
* आजही आपल्या देशात अपंगांचे प्रश्न गंभीर आहेत.  या देशात 2 कोटींहून अधिक लोक अपंगत्वाच्या प्रश्नांशी आणि सुविधा नसल्यानं येणा:या समस्यांशी झगडत आहेत.
 
*  रस्त्यावर राहणा:या, निराधार मुलांचा प्रश्नही देशात गंभीर आहे.  रस्त्यावर राहणारी 35} मुलं व्यसनाधिन झालेली आढळतात.
*  झोपडपट्टीत राहणा:या माणसांची संख्या या देशात वाढते आहे. नागरी सुविधांच्या प्रचंड अभावात ही माणसं जगतात. मुंबईसारख्या शहरात दर सहावा माणूस झोपडपट्टीत राहतो.