शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

 गावकीचे तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

विजयाचा गुलाल पहिल्यांदाच अंगावर पडलेले तरुण ग्रामपंचायत सदस्य नेमकं काय म्हणतात?

- ऑक्सिजन टीम

नुकतीच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आता सरपंच निवडीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात जे काही ‘राजकारण’ होते ते होईलही; मात्र अंगावर नवानवा विजयाचा गुलाल पहिल्यांदाच ज्यांच्या अंगावर उधळला गेला अशा पंचविशीच्या आतल्या तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी ‘लोकमत ऑक्सिजन’ने गेल्याच आठवड्यात गप्पा मारल्या. यातले बहुसंख्य पहिल्यांदाच पंचायतीची निवडणूक लढवत होते, निवडूनही पहिल्यांदाच आले. वय वर्षे २१ ते २५. दूर खेडोपाडी, दुर्गम भागात राहणाऱ्या अजूनही विकासाचं वारं न पोहोचलेल्या गावांतली ही तरुण मुलंमुली. त्यांच्या डोळ्यांत आज तरी आपलं गाव बदलावं, इथं किमान सुविधा मिळाव्यात, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाणही मोठं आहे. लोकमत वृत्तसमूहाच्या गावोगावी पसरलेल्या वार्ताहरांनी सुमारे ५० हून अधिक तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी गप्पा मारल्या, त्यातून हाती आलेली ही काही निरीक्षणं...

१. या निवडणुकीचं एक निर्विवाद फलीत म्हणजे ग्रामपंचायतींना लाभलेला ‘तरुण’ चेहरा. पंचविशीच्या आतला. गावच्या ‘तरण्या’ पोरापोरींनी ठरवलं, की आता बास झालं! आता गावच्या ‘पंचायती’ आम्ही करू.. राजकारण तर असेलच त्यात, पण आता विकासाचं बोलू..

२. काही ठिकाणी गावात विरोध असूनही तरुणांनी आपापली पॅनल्स उभी केली. ही पोरंसोरं काय करणार, म्हणून गावात चेष्टा झाली, त्याकडे लक्ष न देता जिद्दीनं आपलं म्हणणं मांडलं, आणि आपापली पॅनल्स जिंकून आणली. काही ठिकाणी राजकीय पक्षांचं पाठबळ घेतलं, कुठं राजकीय पक्षांना स्पष्ट सांगितलं की, आमचं आम्ही लढतो, तुम्ही जरा सुरक्षित अंतर ठेवा आमच्यापासून, पुढचं पुढे पाहू!

३. यात तरुण मुलींची संख्याही जास्त. शहरांजवळच्या गावांतच कशाला, दुर्गम - आदिवासी भागातही तरुण मुली निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आणि मोठ्या प्रमाणात निवडून आल्या. त्यातल्या काही विवाहित आहेत, काही अविवाहित. राजकारणाच्या पंचायती कशाला, आधी लग्नाचं पाहा, असं सांगणाऱ्यांना या मुली स्पष्ट उत्तर देत म्हणतात, संसारही करूच, पण ज्या गावात राहतेय तिथले प्रश्न दुसरंच कुणी सोडवेल अशी वाट किती दिवस पाहत बसणार आता?

४. निवडून आलेले बहुसंख्य सदस्य गावातच राहणारे. शिकलेले. म्हणजे किमान पदवीधर तरी आहेतच. इंटरनेटचा वापर करणारे, सोशल मीडियाचा हात धरणारे, अनेक जण तर गावातल्या गावात सोशल मीडियावर प्रचार करूनही निवडून आलेले दिसतात.

५. निवडून आलेल्या तरुण सदस्यांना ‘ऑक्सिजन’ने विचारलं, गावात पहिला बदल कोणता करणार?

त्यावर तरुण पुरुष सदस्य मोघम सांगतात की, रस्ते, वीज, पाणी, गटारी यांचे प्रश्न सोडवू.

 

मात्र तरुणी?

त्या थेट सांगतात, आधी घरपोच नळ योजना, आधी पाण्याचा प्रश्न. पहिले हागणदारी मुक्ती, शौचालय पाहिजे. आधी रस्त्यांवर दिवे लावणार!

या गोष्टी किती आम आहेत, असं वाटेलही. पण ज्या मुलींना रोज या प्रश्नांशी लढावं लागतं. पाण्याचे हंडे वाहावे लागतात, रात्री अंधार म्हणून घराबाहेर पडता येत नाही आणि पहाटेच्या अंधारात लपत लोटापरेड करावी लागते; त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य अधिक आहे. बायकांच्या हाती सत्ता आली की, वेगळे प्रश्न अग्रक्रमावर येतात याची एक झलक या उत्तरांत नक्की दिसते.

६. हे तरुण गावकीचा कारभार कसा हाकतील, राजकारणापलीकडे सगळ्यांना सोबत घेऊन गावचा विकास कसा करतील, नक्की करतील का? हे पुढचे प्रश्न, त्याचीही उत्तरं या तरुणांना द्यावीच लागणार आहेत. मात्र तोपर्यंत तरी त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा..!

oxygen@lokmat.com