शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

 गावकीचे तरुण कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

विजयाचा गुलाल पहिल्यांदाच अंगावर पडलेले तरुण ग्रामपंचायत सदस्य नेमकं काय म्हणतात?

- ऑक्सिजन टीम

नुकतीच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आता सरपंच निवडीचे वारे वाहू लागले आहेत. त्यात जे काही ‘राजकारण’ होते ते होईलही; मात्र अंगावर नवानवा विजयाचा गुलाल पहिल्यांदाच ज्यांच्या अंगावर उधळला गेला अशा पंचविशीच्या आतल्या तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी ‘लोकमत ऑक्सिजन’ने गेल्याच आठवड्यात गप्पा मारल्या. यातले बहुसंख्य पहिल्यांदाच पंचायतीची निवडणूक लढवत होते, निवडूनही पहिल्यांदाच आले. वय वर्षे २१ ते २५. दूर खेडोपाडी, दुर्गम भागात राहणाऱ्या अजूनही विकासाचं वारं न पोहोचलेल्या गावांतली ही तरुण मुलंमुली. त्यांच्या डोळ्यांत आज तरी आपलं गाव बदलावं, इथं किमान सुविधा मिळाव्यात, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे. निवडून येणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाणही मोठं आहे. लोकमत वृत्तसमूहाच्या गावोगावी पसरलेल्या वार्ताहरांनी सुमारे ५० हून अधिक तरुण ग्रामपंचायत सदस्यांशी गप्पा मारल्या, त्यातून हाती आलेली ही काही निरीक्षणं...

१. या निवडणुकीचं एक निर्विवाद फलीत म्हणजे ग्रामपंचायतींना लाभलेला ‘तरुण’ चेहरा. पंचविशीच्या आतला. गावच्या ‘तरण्या’ पोरापोरींनी ठरवलं, की आता बास झालं! आता गावच्या ‘पंचायती’ आम्ही करू.. राजकारण तर असेलच त्यात, पण आता विकासाचं बोलू..

२. काही ठिकाणी गावात विरोध असूनही तरुणांनी आपापली पॅनल्स उभी केली. ही पोरंसोरं काय करणार, म्हणून गावात चेष्टा झाली, त्याकडे लक्ष न देता जिद्दीनं आपलं म्हणणं मांडलं, आणि आपापली पॅनल्स जिंकून आणली. काही ठिकाणी राजकीय पक्षांचं पाठबळ घेतलं, कुठं राजकीय पक्षांना स्पष्ट सांगितलं की, आमचं आम्ही लढतो, तुम्ही जरा सुरक्षित अंतर ठेवा आमच्यापासून, पुढचं पुढे पाहू!

३. यात तरुण मुलींची संख्याही जास्त. शहरांजवळच्या गावांतच कशाला, दुर्गम - आदिवासी भागातही तरुण मुली निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आणि मोठ्या प्रमाणात निवडून आल्या. त्यातल्या काही विवाहित आहेत, काही अविवाहित. राजकारणाच्या पंचायती कशाला, आधी लग्नाचं पाहा, असं सांगणाऱ्यांना या मुली स्पष्ट उत्तर देत म्हणतात, संसारही करूच, पण ज्या गावात राहतेय तिथले प्रश्न दुसरंच कुणी सोडवेल अशी वाट किती दिवस पाहत बसणार आता?

४. निवडून आलेले बहुसंख्य सदस्य गावातच राहणारे. शिकलेले. म्हणजे किमान पदवीधर तरी आहेतच. इंटरनेटचा वापर करणारे, सोशल मीडियाचा हात धरणारे, अनेक जण तर गावातल्या गावात सोशल मीडियावर प्रचार करूनही निवडून आलेले दिसतात.

५. निवडून आलेल्या तरुण सदस्यांना ‘ऑक्सिजन’ने विचारलं, गावात पहिला बदल कोणता करणार?

त्यावर तरुण पुरुष सदस्य मोघम सांगतात की, रस्ते, वीज, पाणी, गटारी यांचे प्रश्न सोडवू.

 

मात्र तरुणी?

त्या थेट सांगतात, आधी घरपोच नळ योजना, आधी पाण्याचा प्रश्न. पहिले हागणदारी मुक्ती, शौचालय पाहिजे. आधी रस्त्यांवर दिवे लावणार!

या गोष्टी किती आम आहेत, असं वाटेलही. पण ज्या मुलींना रोज या प्रश्नांशी लढावं लागतं. पाण्याचे हंडे वाहावे लागतात, रात्री अंधार म्हणून घराबाहेर पडता येत नाही आणि पहाटेच्या अंधारात लपत लोटापरेड करावी लागते; त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य अधिक आहे. बायकांच्या हाती सत्ता आली की, वेगळे प्रश्न अग्रक्रमावर येतात याची एक झलक या उत्तरांत नक्की दिसते.

६. हे तरुण गावकीचा कारभार कसा हाकतील, राजकारणापलीकडे सगळ्यांना सोबत घेऊन गावचा विकास कसा करतील, नक्की करतील का? हे पुढचे प्रश्न, त्याचीही उत्तरं या तरुणांना द्यावीच लागणार आहेत. मात्र तोपर्यंत तरी त्यांच्या स्वप्नांना शुभेच्छा..!

oxygen@lokmat.com