शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हो, तुम्हाला कमी ऐकू येतंय. - खोटं वाटतंय?

By admin | Updated: April 26, 2017 16:48 IST

तपासा स्वत:ला.दूध का दूध, पाणी का पाणी..

 - मयूर पठाडे

 
कानठळ्या बसवणारे आवाज, रस्त्यावरचा गोंगाट, गडबड-गोंधळ, प्रत्येक ठिकाणाहून हरघडी येणारे कर्णकर्कश आणि कंठाळी आवाज.. 
 
त्यासाठी जबाबदार अनेक कारणं असली तरी यात तरुणांचाही वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
 
हा तर आमच्या जगण्याचाच एक भाग आहे.
 
त्यामुळे काय एवढं बिघडतं, असं कोणी म्हणेल, पण.
 
या कंठाळी आवाजांचा आपल्याला सराव झाला असला आणि या आवाजासह जगण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेतली असली तरी यामुळे खूप काही बिघडतं.
 
आज दिनांक 26 एप्रिल 2017. ‘जागतिक ध्वनि प्रदुषण जागरुकता दिवस’.
 
त्यानिमित्त आवाजानं नेमकं काय बिघडतं यावर हा प्रकाशझोत.
 
यासंदर्भाचा जागतिक अभ्यास सांगतो, जगातले तब्बल 360 दशलक्ष लोक कानांच्या विकारांनी त्रस्त आहेत. त्यात ‘आवाज’ हेच प्रमुख कारण आहे. कारण इतर कुठल्याही कारणानं त्यांच्यात बहिरेपणा आलेला नाही, तर रोज कानावर आदळणार्‍या आवाजांनी त्यांना बहिरेपण आणलं आहे.
 
जगाचं जाऊ द्या, भारताच्या संदर्भात ही आकडेवारी काय सांगते?..
 
 
भारतात तब्बल 63 लाख लोक कमी ऐकू येण्याच्या किंवा संपूर्ण बहिरेपण  आल्याच्या समस्येनं त्रस्त आहेत.
 
हजार माणसांमागे प्रत्येकी किमान चार माणसांना कमी ऐकू येतं किंवा ते बहिरे आहेत. बहिरेपणाची ही समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. 
 
भीती वाटावी अशी आकडेवारी आणखी पुढेच आहे.
 
जन्माला येणारी नवजात बाळं.
 
त्यांचा काय दोष?
 
पण एक अभ्यास सांगतो, भारतात दरर्षी सुमारे एक लाख बाळं कमी किंवा अजिबात ऐकू न येण्याची समस्या घेऊनच जन्माला येतात.
 
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं, असा प्रo्न विचारणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवं, की.
 
समजा एखाद्या मुलात जन्मत: बहिरेपण असेल, तर ते बोलूच शकत नाही आणि भाषाही त्याला समजत नाही.
 
वाढीच्या पहिल्याच टप्प्यावर एवढी मोठी समस्या असेल तर त्या मुलाच्या संपूर्ण आयुष्यातच अंधार असणार हे उघड आहे.
 
वयाच्या साधारण पहिल्या वर्षीच ही समस्या लक्षात आली तर काही उपाय करता येऊ शकतात, पण दुर्दैव म्हणजे आपल्याकडे बर्‍याचदा मूल तीन-चार वर्षांचं होईपर्यंंत पालकांनाही या समस्येचा पत्ता लागत नाही किंवा त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही.
 
नंतर सुरु केलेल्या उपचारांनी फरक पडत नाही असं नाही, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 
 
 
नॅशनल सॅम्पल सव्र्हे तर यापुढे जाऊन सांगतं, भारतीय लोकांत जे काही व्यंग आहे, त्यातल्या तब्बल दुसर्‍या क्रमांकाचा वाटा बहिरेपणाचा आहे. शहरी भागात कानाचं हे अपंगत्व नऊ टक्के आहे, तर ग्रामीण भागात ते दहा टक्के आहे. 
 
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं? - हा प्रo्न आता तरी कोणी विचारणार नाही.
 
तरीही या कंठाळी आवाजाविरुद्ध काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे. किमान तेवढं तरी आपण करायला हवं.
 
काय करता येईल?
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
 
वाचा इथेच.
 
उद्या.