शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हो, तुम्हाला कमी ऐकू येतंय. - खोटं वाटतंय?

By admin | Updated: April 26, 2017 16:48 IST

तपासा स्वत:ला.दूध का दूध, पाणी का पाणी..

 - मयूर पठाडे

 
कानठळ्या बसवणारे आवाज, रस्त्यावरचा गोंगाट, गडबड-गोंधळ, प्रत्येक ठिकाणाहून हरघडी येणारे कर्णकर्कश आणि कंठाळी आवाज.. 
 
त्यासाठी जबाबदार अनेक कारणं असली तरी यात तरुणांचाही वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
 
हा तर आमच्या जगण्याचाच एक भाग आहे.
 
त्यामुळे काय एवढं बिघडतं, असं कोणी म्हणेल, पण.
 
या कंठाळी आवाजांचा आपल्याला सराव झाला असला आणि या आवाजासह जगण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेतली असली तरी यामुळे खूप काही बिघडतं.
 
आज दिनांक 26 एप्रिल 2017. ‘जागतिक ध्वनि प्रदुषण जागरुकता दिवस’.
 
त्यानिमित्त आवाजानं नेमकं काय बिघडतं यावर हा प्रकाशझोत.
 
यासंदर्भाचा जागतिक अभ्यास सांगतो, जगातले तब्बल 360 दशलक्ष लोक कानांच्या विकारांनी त्रस्त आहेत. त्यात ‘आवाज’ हेच प्रमुख कारण आहे. कारण इतर कुठल्याही कारणानं त्यांच्यात बहिरेपणा आलेला नाही, तर रोज कानावर आदळणार्‍या आवाजांनी त्यांना बहिरेपण आणलं आहे.
 
जगाचं जाऊ द्या, भारताच्या संदर्भात ही आकडेवारी काय सांगते?..
 
 
भारतात तब्बल 63 लाख लोक कमी ऐकू येण्याच्या किंवा संपूर्ण बहिरेपण  आल्याच्या समस्येनं त्रस्त आहेत.
 
हजार माणसांमागे प्रत्येकी किमान चार माणसांना कमी ऐकू येतं किंवा ते बहिरे आहेत. बहिरेपणाची ही समस्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. 
 
भीती वाटावी अशी आकडेवारी आणखी पुढेच आहे.
 
जन्माला येणारी नवजात बाळं.
 
त्यांचा काय दोष?
 
पण एक अभ्यास सांगतो, भारतात दरर्षी सुमारे एक लाख बाळं कमी किंवा अजिबात ऐकू न येण्याची समस्या घेऊनच जन्माला येतात.
 
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं, असा प्रo्न विचारणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवं, की.
 
समजा एखाद्या मुलात जन्मत: बहिरेपण असेल, तर ते बोलूच शकत नाही आणि भाषाही त्याला समजत नाही.
 
वाढीच्या पहिल्याच टप्प्यावर एवढी मोठी समस्या असेल तर त्या मुलाच्या संपूर्ण आयुष्यातच अंधार असणार हे उघड आहे.
 
वयाच्या साधारण पहिल्या वर्षीच ही समस्या लक्षात आली तर काही उपाय करता येऊ शकतात, पण दुर्दैव म्हणजे आपल्याकडे बर्‍याचदा मूल तीन-चार वर्षांचं होईपर्यंंत पालकांनाही या समस्येचा पत्ता लागत नाही किंवा त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही.
 
नंतर सुरु केलेल्या उपचारांनी फरक पडत नाही असं नाही, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 
 
 
नॅशनल सॅम्पल सव्र्हे तर यापुढे जाऊन सांगतं, भारतीय लोकांत जे काही व्यंग आहे, त्यातल्या तब्बल दुसर्‍या क्रमांकाचा वाटा बहिरेपणाचा आहे. शहरी भागात कानाचं हे अपंगत्व नऊ टक्के आहे, तर ग्रामीण भागात ते दहा टक्के आहे. 
 
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं? - हा प्रo्न आता तरी कोणी विचारणार नाही.
 
तरीही या कंठाळी आवाजाविरुद्ध काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे. किमान तेवढं तरी आपण करायला हवं.
 
काय करता येईल?
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
 
वाचा इथेच.
 
उद्या.