शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जे करताय, ते का करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:58 IST

आपण एखादी गोष्ट करतो; पण ती का करतो, याचं उत्तर आपल्याकडे हवं. नाही तर ती कशी करतो याचे अर्थच बदलतात. म्हणून विश्लेषण करत बसण्यापूर्वी जरा संश्लेषण करा. मग बघा काय होतं.

ठळक मुद्दे‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्समध्ये ‘विचारांची स्पष्टता’ ही आत्यंतिक महत्त्वाची आहे. आपण एखादी गोष्ट ‘कशी’ करतो  हे जसं महत्त्वाचं तसं ती गोष्ट ‘का’ करतो हेही महत्त्वाचं. त्या का चे उत्तर निर्‍संदिग्धपणे माहिती असणं म्हणजे विचारांची स्पष्टता असणं.म्हणजेच हेतू जर माहिती असेल तर बहुतांश वेळा कृतीमध्येसुद्धा स्पष्टता येते.हा हेतू माहिती करून घेणं म्हणजे sunthesis त्याला मराठीत संश्लेषण म्हणतात. विश्लेषण म्हणजे अ‍ॅनालिसिस हा शब्द आपण सहज वापरतो. त्यासोबत संश्लेषण करता येणं हे सॉफ्ट स्किल.तुम्हाला मी काही साधी उदाहरणं देतो म्हणजे हे संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येईल.कसाई धारदार शस्त्रानं पोट फाडतो आणि निष्णात शल्यविशारदही तेच करतो; पण हेतू पूर्ण वेगळे! म्हणजे का या एका गोष्टीनं कृतीचा हेतू बदलला.अजून एक उदाहरण. का नंतर कसं केलं याचं.घरी पाहुणे आलेले असताना मला बायकोने ‘पटकन पोहे घेऊन ये’ असं सांगितलं आणि मी चिवडय़ाचे पातळ पोहे घेऊन आलो! पुढे, पाहुणे गेल्यानंतर आमच्यात जो प्रेमळ संवाद घडला त्याचं सविस्तर वर्णन देण्याची ही जागा नव्हे, नाही का? तर करिअर घडवतानासुद्धा आपण एखादी पदवी/ पदविका ‘का’ करतो आहोत याचं उत्तर आपण नीट जाणलेलं असणं महत्त्वाचं. त्यानं तुम्हाला खूप फायदे होतील.जॉबच्या किंवा शिष्यवृत्तीसाठीच्या मुलाखतींमध्ये अनेकदा याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ तुम्हाला यूपीएससी परीक्षा का द्यायची होती’ किंवा तुम्ही ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग का निवडलंत?’ किंवा तुम्हाला आमच्याच कंपनीत/ याच जॉब रोलमध्ये नोकरी का करायची आहे?आता या सगळ्या आणि या प्रकारच्या का प्रश्नांना देवाची करणी अन् नारळात पाणी टाइपचे उत्तर देणं धोक्याचं आहे हे तुम्ही ओळखलं असेल!काही वर्षापूर्वी मला धक्का बसला होता. तृतीय वर्ष बी.कॉम.च्या मुलानं मला फोन केला होता. हे विचारायला की आता तीन महिन्यात मी ग्रॅज्युएट होणार तर मी आता नोकरी करू, ती कशी शोधू की एमसीएम करू?मी जेव्हा त्याला विचारलं, की तू जेव्हा तीन वर्षापूर्वी बी.कॉम. सुरु केलंसं तेव्हा तुझ्या मनात काय होतं? आपण बी.कॉम. करून कुठे नोकरी करणार? तर तो म्हणाला मी बी.कॉम. मित्र करत होते म्हणून केलं, फारसा विचार नाही केला! आजकाल मला असे धक्के बसणे कमी झालं आहे. याचं कारण हे नाही की मला अशी मुलं-मुली भेटत नाहीत, तर कारण हे आहे की इतकी मुलं-मुली भेटली आहेत की मन निर्ढावलंय!सिमॉन सिनेक नावाच्या लेखकाचं एक पुस्तक खूप भावलं. ते तुम्हाला जाता जाता सांगून ठेवतो. त्याचं नाव आहे ‘स्टार्ट विथ व्हाय’हेतू समजला तर निर्णयक्षमता वाढते यात शंकाच नाही. म्हणजेच ‘का’ समजलं तर ‘काय’ आणि ‘कसं’ हे सहजसाध्य असेल.मी जेव्हा जेव्हा विद्याथ्र्याबरोबर संवाद साधतो तेव्हा तेव्हा हा विचार करतो की आज मी जे काही त्यांना सांगणार आहे ते ‘का’ सांगणं महत्त्वाचं आहे.  ‘काय’ आणि ‘कसं’ हे तर गूगलही सांगू शकतं. आजकालची पिढी ते सहज शोधूही शकते. ‘का’ कळलं की ‘काय’ आणि ‘कसं’ सहज समजतं.नुसत्या माहितीपेक्षा ‘का’चा संदर्भ वापरून करतात ते संश्लेषण किती महत्त्वाचं आहे हे येतंय ना लक्षात?बघा म्हणजेरेड लेबल असं म्हटलं कुणी.तर ते कोण, का, कसं, कधी म्हटलंय यावरून तुम्ही अर्थ काढता ना? मग कृती करता.कधी चहा आणता आणि कधी.कळलं ना? का किती महत्त्वाचं ते.

(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)