शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

रस्त्यावर उतरलेले दिल्लीसह देशातले विद्यार्थी का चिडलेत?

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:05 IST

एका कायद्याला विरोध करणं हा गुन्हा आहे का? असा सवाल घेऊन

ठळक मुद्देहे आंदोलन पुढे कुठं जाईल? असंतोष काय आकार घेईल हे येत्या काळात कळेलच.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

जेएनयू तसंही नेहमी चर्चेत असतं.तिथल्या विद्याथ्र्याची आंदोलनं या वर्षात सदैव बातम्यांत झळकली. सोशल मीडियात तर त्यावर भयंकर गदारोळ होत राहिला. कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही अशी बिरुदं चिकटवण्याचा मक्ता घेतल्यासारखी वटवटखोर सोशल मीडिया तज्ज्ञांनी लेबलं चिकटवली.मात्र यासार्‍यात जेएनयूतली आंदोलनं थंडावली नाहीत.आणि आता तर गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात जी भयंकर हातापायी सुरू आहे, त्याचं फुटेज सार्‍या देशानं पाहिलं. जेएनयू, जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लीम विद्यापीठ येथील विद्याथ्र्यानी नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन उभारलं. आणि ते आंदोलन मोडून काढायचं म्हणून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली.त्या कारवाईची थेट दृश्यही देशानं पाहिली.

आणि सोशल मीडियात हीरो आणि व्हीलन ठरलेल्या, एकाचवेळी शिव्याशाप खाणार्‍या आणि दुसरीकडे अत्यंत धाडसी म्हणून नावारूपाला आलेल्या दोन मुलींचीही चर्चा झाली.आयेशा रेनन आणि लदीदा फर्झाना या दोन तरुणी दिल्ली पोलिसांसमोर उभ्या राहिल्या, त्यांच्या एका पुरुष मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या आणि त्याची सुटका त्यांनी केली.हातात शस्र नाही; पण डोळ्यात आग आहे, प्रतीकाराची क्षमता आहे आणि धाडसही आहे अशा चेहर्‍यासह बंदुकधारी पोलिसांसमोर उभ्या या मुलींचे फोटो व्हायरल झाले, चित्रं काढली गेली, आणि त्यांचा चेहरा या आंदोलनाचाही चेहरा बनत गेला.या मुलींना भयंकर ट्रोलही करण्यात आलं, दुसरीकडे त्यांच्या धाडसाचं कौतुकही झालं.विद्यापीठाचं आवार, होस्टेल या परिसरात झालेल्या पोलिसी कारवाईबद्दल अनेकांनी निषेधही व्यक्त केला.आणि त्यामुळे हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं उरलं नाही. विद्याथ्र्यावर लाठीमार झाला हे पाहून देशभरातून अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले.

आयआयटी, मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई विद्यापीठ, कानपूर आणि मद्रास आयआयटी, हैदराबाद विद्यापीठ, दिल्ली युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यासह देशभरातल्या विद्याथ्र्यानी मोर्चे काढले. आंदोलनात सहभागी होत हे स्पष्ट सांगितलं की, विद्याथ्र्यावर असे हल्ले योग्य नव्हेत.देशभरात अनेक विद्याथ्र्यानी विविध विद्यापीठात परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. दडपशाही चालणार नाही म्हणून तरुण विद्यार्थी आंदोलन करत आहेत.हे आंदोलन पुढे कुठं जाईल? असंतोष काय आकार घेईल हे येत्या काळात कळेलच.