-राहुल बनसोडे
गोष्ट तशी थोडी जुनी, पण फार जुनी नाही. कुठल्याशा लहानशा शहरात, कुठलीशी मुलींची शाळा, कुठलीशी मुलांची आणखी वेगळी शाळा. वयाची चौदा-पंधरा वर्षे होईर्पयत या वेगवेगळ्या शाळेत शिकणार्या मुलींना मुलगा कसा असतो त्याबद्दल फारसे काही माहिती नाही, मुले तर मुलींशी बोलायलाही कचरतात. मग दहावीचे वर्ष सुरू होते आणि एव्हाना एकमेकांबद्दल काही विशेष माहिती नसलेली ही मुले एकाच कोचिंग क्लासमध्ये एकत्र येतात. क्लासमध्येही मुले सर्व एकीकडे बसतात मुली सर्व दुसर्या बाजूला. स्री आणि पुरु ष अशी स्पष्ट विभागणी असलेल्या त्या क्लासमधली कुठलीही मुलगी कुठल्याही मुलाशी कधीच बोललेली नसते, ती नुसती बोलली जरी तरी काय होईल याची कल्पना तिला आहे. क्लासमध्ये सतरंज्यावर येऊन बसलेल्या एकूणएक मुलाला त्या क्लासच्या रूममध्ये मुलीही आहेत याची जाणीव असतेच; पण ती तिथेच. शिक्षकांना यायला कधी उशीर झाला तर चुकून मुलं मुलींकडे पाहतात, मुली मुलांकडे पाठ करून त्यांच्या गप्पाटप्पांमध्ये रममाण आणि त्यांचा कलकलाट चालू. चुकून एक मुलगी मुलांकडे चोरून पाहते. त्या मुलांमधला एकचण आपल्याकडेच पाहतोय याची तिला जाणीव होते. एकाचवेळी कुतूहल, त्रास, अस्वस्थता, आश्चर्य आणि किंचित आनंदही. या मिश्र भावना एकदमच कुठून येतात माहिती नाही. ती त्याच्याकडे त्या दिवशी दुर्लक्ष करते, नंतर कधीतरी परत एकदा सरांना उशीर होतो आणि क्लासमधल्या गप्पाटप्पा आणि गोंधळ पुन्हा सुरू होतो. कुतूहलाने ती पुन्हा एकदा त्या मुलाकडे पाहते. यावेळीही तो तिच्याकडेच पाहत असतो. हा आपल्याकडेच पाहतो आहे याची तिला पक्की खात्री पटते. मध्यमवर्गीय संस्कार, आई-वडिलांचा धाक, इतर मैत्रिणींनी आणलेली नैतिक बंधनं अशा प्रचंड दडपणाखाली असलेल्या त्या मुलीला तिच्याकडे पाहणार्या या मुलाच्या भावनेला नेमका काय प्रतिसाद द्यावा हे माहिती नसते. शिवाय तो तिच्याकडे पाहतो हे तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितल्यावर ती आणखीनच अस्वस्थ होते. याचे पाहणे बंद व्हावे म्हणून मग एक दिवस ती आणि तिच्या मैत्रिणी एकत्रितरीत्या त्याच्याकडे एकटक पाहतात. तो थोडावेळ गोंधळतो आणि पाहणं थांबवतो, एक-दोन दिवसानंतर त्याचे तिच्याकडे एकटक पाहणे पुन्हा सुरू होते. या प्रकाराचा तिला त्रास व्हायला लागतो; पण तो फक्त पाहतोच आहे अजून तर काही करीत नाही ना याकारणाने ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते, किमान दुर्लक्ष करते आहे असे स्वतर्ला तरी समजावते; पण हे तिचे तिलाच फसवणे आहे हे तिला माहिती असते. तो मुलगा मात्र तिच्याकडे पाहणे बंद करीत नाही; पण प्रत्यक्ष तिच्यासमोर जाऊन तिच्याशी काही बोलण्याचीही त्याची हिंमत होत नाही. बोलणार तरी काय आणि कसे? दिवस सरतात आणि शाळा संपते, दोघे पास होतात आणि एकाच कॉलेजात अॅॅडमिशन घेतात. तरु णपणाची नवनवी स्वप्ने पाहतात. मुलात अजूनही हिंमत येत नाही; पण तो तिच्याकडे पाहणेही थांबवत नाही, इथे कोचिंग क्लासपेक्षा थोडी जास्त मुभा असल्याने तो तिच्या आसपास घुटमळू लागतो, क्वचित ती घरी जायला निघाली म्हणजे तिचा पाठलाग करतो, तिला ऐकू जाईल अशा आवाजात मित्रांशी तिलाच उद्देशून बोलतो. हळूहळू त्या मुलीला हे असह्य होऊ लागते, त्यात मैत्रिणी हा त्रास घालविण्याचे वेगवेगळे सल्ले देतात. त्यातला महत्त्वाचा एक सल्ला की सरळ त्याच्याशी बोल आणि हे असे पुन्हा केले तर परिणाम वाइट होतील असे सांग. मुलीतही बोलण्याची हिंमत नसते, खासकरून तेव्हा जेव्हा तिला तो मुलगा त्रास देतोय. दिवस असेच जात राहातात आणि त्या मुलाचे तिला छेडीत राहाणे थांबत नाही. मग एक दिवस सगळचं असह्य झाल्याने ती हा प्रकार भावाला सांगते. भाऊही मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेला, थोडासा भित्रट, तो त्याच्या जिमला जाणार्या एका मित्राची मदत मागतो. दोघे एकदिवस कॉलेजला येतात, तो मुलगा घोळक्यात उभा असतो, ती मुलगी आपल्या भावाला लांबूनच त्या मुलाला दाखवून देते, मग भाऊ आणि त्याचा मित्र त्या मुलाकडे जातात आणि त्याला मारहाण सुरू करतात, मारीत मारीत त्याला त्या मुलीकडे घेऊन जातात, तिच्या पाया पडायला लावतात आणि तिला ताई म्हणायला लावतात. मुलीला हे इथपर्यंत जाईल असे अजिबात अपेक्षित नसते, तो मुलगा पाया पडताना ती पाय मागे सरकवते, स्रीसुलभ लज्जेने म्हणा किंवा मग झाल्या प्रकाराच्या अपराधी भावनेतून म्हणा. त्या संध्याकाळी तिचा त्रास थांबतो, मुलगा नंतर तिच्या वाटय़ाला जात नाही, तो कॉलेजला जाणेही बंद करतो. मुलगी शिक्षणात स्थिरावते, झाला प्रकार उभ्या कॉलेजने पाहिलेला असल्याने तिला परत कुणी छेडण्याची हिंमतही करीत नाही. यथावकाश कॉलेजही संपते आणि पोस्टग्रॅज्युएशन सुरू होते. मुलगा परत कॉलेजला अवतरतो. यावेळी त्याच्या मनावरच्या जखमांवर खपली धरलेली असली तरी झाला प्रकार तो विसरलेला नसतो; पण यावेळी वेगळेच काही होते. एवढय़ा पाच-सहा वर्षात मुले-मुली बरीच धीट झालेली असतात, त्यांच्यामध्ये संवाद सुरू झालेले असतात. क्वचित प्रेमप्रकरणेही सुरू झालेली असतात. तो परतल्यानंतरही तिच्याकडे अधूनमधून पाहणे बंद करीत नाही; पण यावेळी त्या पाहण्यात प्रचंड करु णा असते, इतकी की तिने त्याच्याशी डोळा भिडवला तर तिला अपराधीपणाची जाणीव व्हावी. ही नजरानजर काही वेळाच होते आणि त्या मुलाला जरा चांगलीच गर्लफ्रेंड मिळते. त्या गर्लफ्रेंडवर त्याचे किती प्रेम आहे किंवा मग त्या गर्लफ्रेंडचे त्याच्यावर किती प्रेम आहे हा हिशेब वेगळा; पण या दोघांचे नाते तिला कळते, ते दोघे वरचेवर तिला दिसत राहातात, कधीकाळी हिच्याशी बोलायला घाबरणारा तो आता आपल्या गर्लफ्रेंडचा हातात हात घेऊन सबंध कॅम्पसमध्ये फिरत असतो. तिने त्याला कधीकाळी मार खाऊ घालून जितके दुखावले असावे त्यापेक्षा जास्त तो तिला दुखावतो.
ओ.एल.डी. - ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर मागे लागण्यापासून बदला घेण्यार्पयतचा प्रवास
* ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर या आजारात एखाद्या व्यक्तीला दुसर्या व्यक्तीबद्दल प्रचंड प्रेम निर्माण होते आणि तो प्रेमाने पुरता झपाटून गेल्यासारखा वागतो. नाते दोन्ही बाजूंनी असल्यास आणि या नात्यातला पुरु ष झपाटलेला असल्यास तो आपल्या गर्लफ्रेंडकडे कुणी पाहिले तरी त्याच्याशी पंगा घेतो, गर्लफ्रेंडला कुणी काही बोलले तर त्याची हड्डीपसली एक करतो, इवल्याशा कारणासाठी गर्लफ्रेंडलाही सतत दटावत राहातो. * अलीकडे आलेल्या कबीर सिंग या चित्रपटाचा नायक अशा व्यक्तिमत्त्वांच्या फार जवळ जाणारा आहे. या सिनेमाचा शेवट काहींना आवडला असला तरी त्यातल्या नायकाच्या वागण्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणारे नाही. * ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर हा आजार पुरु षाला एकतर्फी प्रेमातून उद्भवला असल्यास तो जिच्या प्रेमात पडला आहे त्या स्रीच्या सदैव मागावर असतो. तिला पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, तिच्याशी बोलण्यासाठी, तिच्या सहवासासाठी तो सदैव आतुर असतो. ती स्री नजरेसमोर नसल्यास तिच्या घराबाहेर चकरा मारणे, तिला सतत फोन करणे, फेसबुकवर तिचे फोटो न्याहळत बसणे, फेक प्रोफाइलवरून तिला त्रास देणे, व्हॉट्सअॅपवर मेसेज करीत राहाणे अशा अनेक कृती त्याच्या हातून घडत असतात. * 2003 साली आलेला तेरे नाम हा सिनेमा. एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह झालेल्या नायकाची कहाणी आहे. त्याच्या शेवटाला नायिकेला नायकाचे प्रेम कळून चुकते असे दाखवले आहे; वास्तव जीवनात मात्न असे कधीही होत नाही. एकदा एखादा पुरु ष एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह झाला की त्याच्यापासून सुटका मिळवणे सहजशक्य नसते आणि त्याच्या वागणुकीचा इतिहास पाहता त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणे अगदी नाइलाजाने ही शक्य नसते. अशा परिस्थितीत स्रीचे दैनंदिन जीवन त्रासाचे होते आणि कित्येकदा तिचे सार्वजनिक आयुष्यच धोक्यात येऊ शकते. * नात्यांमध्ये स्रियादेखील ऑब्सेसिव्ह असू शकतात; पण त्यांचे हे ऑब्सेशन बरेचदा नैसर्गिक पातळीवर असते आणि काही अपवाद वगळल्यास त्यातून टोकाची परिस्थिती निर्माण होत नाही.* एकतर्फी प्रेमात ऑब्सेसिव्ह होणार्या स्रियांचे प्रमाण पुरु षांपेक्षा खूप कमी आहे. शिवाय एखादी स्री आपल्या एकतर्फी प्रेमात पडली आहे ही बाब बर्याच पुरु षांना सुखावणारी असते; पण ही सुरु वातीची सुखावणारी बाब त्या पुरु षाची नोकरी जाईर्पयत, त्याचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होईर्पयत आणि त्याचे संपूर्ण करिअर संपण्यार्पयत जाऊ शकते. *****..व्हेन इट हर्ट्स टू मच!तुम्ही कुणावर एकतर्फी प्रेम करत असलात, तर..
* ऑब्सेसिव्ह लव्ह - व्हेन इट हर्ट्स टू मच टू लेट गो या पुस्तकाच्या लेखिका सुझन फॉरवार्ड यांच्या मते, राग आणि प्रेम या दोन्ही गोष्टी परस्परांच्या विरु द्ध असल्यातरी ऑब्सेसिव्ह प्रेमात त्या एकत्र नांदत असतात. असा माणूस प्रेम व्यक्त करतोय की राग व्यक्त करतोय हे कळायला मार्ग नसतो आणि अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या मागे लागण्यापासून तिचा बदला घेण्यापर्यंत ऑब्सेसिव्ह व्यक्ती येऊन पोहोचते. * सतत साचत गेलेले प्रेम आणि सतत साचत राहिलेल्या रागाची परिणीती मग त्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार करण्यात, शारीरीक हानी करण्यात आणि वेळप्रसंगी थेट हत्या करण्यात होते. ही टोकाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी ऑब्सेसिव्ह माणसांविरु द्ध कायदेशीर तक्र ार करून त्याला अटकाव केला जाऊ शकतो; पण कित्येकदा टोकाची परिस्थिती येईपर्यंत त्या व्यक्तीने कायदा मोडलेला नसतो वा त्याला शिक्षा करण्याइतपत व्यवस्था सक्षम नसते.*ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर ही संज्ञा मानसशास्रज्ञांनी मांडली असली तरी मानसिक उपचारांमध्ये तिला अद्याप अधिकृतता देण्यात आलेली नाही. * एखाद्याला ऑब्सेसिव्ह लव्ह डिसॉर्डर झालेला असल्यास त्याने सर्वप्रथम एकतर्फी प्रेमात पडलेल्या माणसांपासून दूर जाण्याचे प्रयत्न सुरू केले पाहिजेत, हे अवघड आहे; पण अशक्य अजिबात नाही. * केवळ एक व्यक्ती आपल्यावर प्रेम करीत नाही म्हणून कुणीच आपल्यावर कधीच प्रेम केलेले नाही अशा भ्रमात कधीही राहू नये. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला मिळवता आली नाही आणि तिला मिळविण्यासाठी आपण काहीही केले असते असे विचार मनाशी करू नये कारण हे ‘जे काहीही करणे’ होते त्यातून तिला जसा त्रास झाला असता हे लक्षात ठेवलेले बरे.* आपण जिच्या प्रेमात होतो तिच्याशी बदला घेण्याचा सर्वात सुखकर आणि गोड मार्ग असतो तो तिच्यापेक्षाही चांगल्या व्यक्तीशी नाते जुळवून ते टिकवून दाखवण्याचा. मानसशास्र ओ.एल.डी.च्या अवस्थेला जोर्पयत अधिकृत मान्यता देत नाही आणि त्यावर औषध शोधून काढत नाही तोपर्यंत हा एकच मार्ग आहे, तारतम्याने वागण्याचा!
(लेखक मानववंशशास्र आणि समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)