शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बिचकतो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:23 IST

गावातून जिद्द आणलीच होती, शहरानं रीत शिकवली तेव्हा कुठं स्वत:ची ओळख पटली...

- किशोर डंभारेमाझं गाव तसं खूपच छोटं. चारशे-पाचशे लोकवस्तीचं. सावंगी देरडा. पोस्ट तरोडा, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा हा माझा पत्ता. एकेकाळी या गावात पक्की सडकपण नव्हती. टेलिफोनची सुविधा नव्हती. २००० सालापर्यंत मोबाइलसुद्धा गावात पोहोचला नव्हता. तीन गाव मिळून एक गट ग्रामपंचायत, जी आजही आहे. डॉक्टर नाही, शाळा चौथीपर्यंतच.एक छोटंसं दुकान फक्त होतं. तिथं गोळ्या-बिड्या मिळायच्या. एक साधा कुणाला फोन करायचा म्हटलं तरी पाच किलोमीटरवर असलेल्या मांडगाव किव्वा तरोडा गावी जावं लागायचं. शिक्षणाचं कुणाला कौतुक नव्हतं. पन्नास टक्के मुलं दहावीपर्यंत, २५ टक्के मुलं जेमतेम बारावीपर्यंत जात. पदवीपर्यंत जाणारे कमीच. शेती, शेतमजुरी करून जगायचो सारे. आजही हे चित्र काही फार बदललेलं नाही.आला शहाणा शिकणार, आता बॅरिस्टरच बनणार असं लोक सर्रास म्हणत. चौथीपर्यंत मी गावच्या शाळेत शिकलो. पुढं दुसºया गावात. बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी शाळेत जाणं अनिवार्य बाकी अर्धे अधिक दिवस घरी व शेतीवरच राहायचो. दहावी तर पास झालो. पुढे समुद्रपूरला विद्याविकास विद्यालयात प्रवेश घेतला. रोज १६ किलोमीटरवर सायकलनं जाणं फार अवघड व्हायचं; पण बसला पैसे नसायचे. कसंबसं बारावीही उत्तीर्ण झालो.वाटायचं शेतात काम करून जगणं फारच अवघड आहे, आपण शिकायला हवं. काहीतरी करायला हवं. गाव सोडल्याशिवाय शिक्षण होणार नव्हतं. शेवटी गाव सोडलं, आणि मग गाव सोडायचा निर्धार पक्का झाला. २००० साली थेट शेगाव गाठलं. आयुष्यात पहिल्यांदा घर, आईवडील, मित्र आणि गावही सोडलं. शेगावला आयुष्याच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली. मी इंजिनिअरिंग शिकू लागलो.शहरात किंवा उच्चशिक्षित, आर्थिक सबळ लोकांच्या दुनियेत काय असतं आणि काय नसतं हे जवळून पाहण्याचा योग आला. जगण्याची नवी रीत समजली. स्वच्छ, टापटीप राहणं, खाणं, बोलणं या वातावरणानं शिकवलं. छोट्याशा गावातून आणलेली जिद्द, प्रामाणिकपणा, संयम, कठोर परिश्रम करण्याची तयारी हे सारं सोबत होतंच. दोन्ही जगातल्या चांगल्या गोष्टींची जोडी लावून टाकली.पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन नागपूर विद्यापीठातून पूर्ण केलं. जिद्द वाढली होती. हुरूप आला होता. अचानक वडील गेले. कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आली. शेगाव सोडलं आणि अमरावतीत पोहोचलो. या शहरानं मला व्यवहार आणि दुनियादारी शिकवली. प्रगतीचा वेग वाढवल्याशिवाय ध्येयापर्यंत पोहचता येणार नाही ही जाणीव करून दिली. शर्यतीत आहोत तर पहिल्या नंबरसाठीच धावायचं हे शिकवलं. खेड्याचा आणि शहराचा रंग मिळून नवीन नवा रंग तयार झाला. यश हाताशी लागायला लागलं.सुरु वातीची कमीपणाची भावना आणि लाजाळूपणा कमी झाला. मग लक्षात आलं की, या शहरांना बिचकायचं काय कारण? शहरंही आपलीच आहेत. इथली अनेक माणसं आपल्यासारखीच कधीकाळी कुठल्याशा खेड्यातून आलेली असतील. त्यांची माणसंही कुठल्या तरी खेड्यात असतील. जीवन सुखी करण्याची साधनं या शहरात भरपूर आहेत त्यांना गावाकडच्या समाधानाशी जोडलं की जगणं सुंदर होईल. समृद्धही होईल. शहरातलं आपल्याला जे आवडतं, पटतं ते ते घ्यायचं. नाही रुचलं ते सोडून द्यायचं किंवा दुर्लक्ष करायचं. गाव सोडून शहरात गेल्यावर ते शहर आपल्याला आपलीच ओळख करून देतं, हे नक्की!