शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

प्रसंगावधान ते आणायचं कुठून?

By admin | Updated: September 4, 2014 16:43 IST

मुलाखतीत तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, उत्तर सोडा, प्रश्नही कानावरून गेलेला नसतो, अशावेळी काय करता तुम्ही ?

विनोद बिडवाईक
 
‘फॅक्टरीज अॅक्ट कोणत्या सेक्शन खाली कंपनीच्या संचालकांना अटक होऊ शकते?’ 
-असा एक प्रश्न एका हुशार मुलाखतकर्त्याने नुकत्यात एमबीए झालेल्या हुशार मुलाला विचारला. याचं उत्तर मुलाखतकर्त्याला  कितपत माहिती होतं, माहीत नाही, पण त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं. ‘‘सर,  फ्रॅकली स्पिकिंग मला हा सेक्शन आठवत नाही, पण जर माझं सिलेक्शन  झालं तर कंपनीच्या संचालकांना अटक होणार नाही एवढं परफेक्ट काम मात्र माझं असेल.’’
हे उत्तर चूक होतं की बरोबर, हा प्रश्न वेगळा. पण त्या तरुणानं प्रसंगावधान दाखवून वेळ धकवून नेली. रोजच्या जीवनात घडणा-या किती गोष्टी आपल्या लक्षात राहतात? त्यातील किती गोष्टी आपल्या मनाप्रमाणो घडतात आणि किती गोष्टी तुमच्यावर प्रभाव गाजवतात याचे एक तुलनात्मक स्टेटमेंट बनवल्यावर आपल्या लक्षात खूप काही विचार येतात आणि एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कॉमनसेन्स आणि प्रसंगावधान. या गोष्टी आपल्याला यशाच्या पायरीर्पयत निश्चितच घेऊन जाऊ शकतात.
आपल्या रोजच्या जीवनात असंच प्रसंगावधान अपेक्षित आहे. पण सर्वानाच ते जमतं असं नाही. प्रसंगावधान  ही संभाषण चातुर्याची पहिली पायरी आहे. एखाद्या क्रिटिकल परिस्थितीत आपण गोंधळतो, काय करावं नेमकं हेच आठवत नाही. डोक्यात येत नाही तेव्हा हे प्रसंगावधान कामी येतं.
काही लोकांनाच ही कला जमते? पण त्यांनाच का जमते? प्रयत्न केला तर थोडय़ाशा अनुभवानं  तुम्हालाही जमू शकेल. मुळात प्रसंगावधानाची  आवश्यकता कोठे पडते? ती साध्या घटनात फारसं महत्त्व ठेवत नाही, पण अशा बुद्धीचा कस लागतो तो एखाद्या गंभीर घटनेत. खरंतर मोक्याच्या घटनांच्या वेळी तर्कसंगत बुद्धीचा योग्य वेळी वापर करून परिस्थिती निभावून नेणं म्हणजे हे प्रसंगावधान.
प्रश्न आहे ते आणायचं कुठून? दाखवायचं कसं ? एखाद्या घटनेकडे बघताना, एखादी घटना अनुभवताना एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याची कुवत. जॉब करताना आणि करिअरच्या पाय:या चढताना प्रत्येकवेळी अगदी किचकट आणि कठीण पद्धतीनंच प्रश्न सोडवायची गरज नसते.  इंटरव्ह्यू देताना, प्रेङोण्टेशन देताना, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना, एखादी परिस्थिती सांभाळताना ब:याचदा हे प्रसंगावधानच उपयोगी येतं.  तुमच्या अवतीभोवती तुमच्या संबंधित घटना घडते. अगदी स्पंजप्रमाणो ती घटना आणि त्या घटनेमागचं लॉजिक टिपून घेतलं की, तुम्हाला विचारांची संगती लावता येईल.
काही व्यक्ती बोलण्यात चतुर असतात, त्या शाब्दिक कोडी छान करतात, प्रसंगनिष्ठ विनोद करतात. एखादं वातावरण हलकंफुलकं करतात. कारण एखादी विसंगती टिपण्यासाठी आवश्यक असणारी त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. तो त्यांचा स्थायीभाव बनतो, अशा व्यक्तीचं प्रत्येक बोलणं हे त्याचं प्रसंगावधान असतं. नव्या काळात हे शिकावंच लागेल. तर आणि तरच निभाव लागण्याची काही शक्यता आहे.